Monday, June 23, 2025 06:25:33 AM

सरकार रालोआचं, मंत्रिमंडळ मोदींचं

मोदींच्या नेतृत्वात केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाले आहे. पण २०१४ आणि २०१९ प्रमाणेच मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींचाच प्रभाव दिसत आहे.

सरकार रालोआचं मंत्रिमंडळ मोदींचं

नवी दिल्ली : मोदींच्या नेतृत्वात केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाले आहे. पण २०१४ आणि २०१९ प्रमाणेच मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींचाच प्रभाव दिसत आहे. मोदींनी त्यांच्या विश्वासातील मंत्र्यांच्या आधीच्या जबाबदाऱ्या कायम ठेवल्या आहेत. हे करून केंद्र सरकारच्या प्रमुख धोरणांमध्ये बदल होणार नाही, असा संकेत पंतप्रधान मोदींनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळालेली खाती

  1. नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  2. पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  3. प्रतापराव जाधव - राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  4. रामदास आठवले - राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
  5. रक्षा खडसे - राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
  6. मुरलीधर मोहोळ - राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय

रालोआ सरकारचे केंद्रीय मंत्री
१ पंतप्रधान नरेंद्र मोदी - पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा, अंतराळ, कार्मिक, सांख्यिकी आणि कोणत्याही मंत्र्याकडे नसलेली जबाबदारी
२ राजनाथ सिंह - संरक्षण
३ अमित शाह - गृह आणि सहकार्य
४ नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग
५ जेपी नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
६ शिवराज सिंह चौहान - कृषी. ग्रामीण विकास     
७ निर्मल सीतारामन - अर्थ, कॉर्पोरेट घडामोडी
८ एस जयशंकर - परराष्ट्र व्यवहार
९ मनोहर लाल - ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
१० एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग, पोलाद
११ पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग
१२ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण
१३ जीतन राम मांझी - सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
१४ लल्लन सिंग - पंचायती राज, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन
१५ सर्बानंद सोनोवाल - बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग
१६ वीरेंद्र कुमार सामाजिक - न्याय आणि अधिकारिता
१७ राम मोहन नायडू - नागरी विमान वाहतूक  
१८ प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण. नवीन आणि अक्षय ऊर्जा
१९ जुआल ओरम - आदिवासी व्यवहार
२० गिरीराज सिंग - कापड उद्योग
२१ अश्विनी वैष्णव - रेल्वे, आय अँड बी. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी
२२ ज्योतिरादित्य एम सिंधिया - दूरसंचार आणि ईशान्य भारत
२३ भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल
२४ गजेंद्र सिंह शेखावत - सांस्कृतिक आणि पर्यटन
२५ अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास    
२६ किरेन रिजिजू - संसदीय कामकाज. अल्पसंख्याक व्यवहार
२७ हरदीप पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
२८ मनसुख मांडविया - कामगार व रोजगार. युवा घडामोडी आणि क्रीडा
२९ जी किशन रेड्डी - कोळसा आणि खाणी
३० चिराग पासवान - फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज
३१ सी.आर.पाटील - जलशक्ती

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
३२ राव इंद्रजित सिंग - सांख्यिकी, नियोजन आणि संस्कृती                                                         
३३ डॉ जितेंद्र सिंग - विज्ञान आणि तंत्रज्ञान. पृथ्वी विज्ञान. PMO. अणुऊर्जा. जागा.
३४ अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय. संसदीय कामकाज.
३५ जाधव प्रतापराव गणपतराव - आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण
३६ जयंत चौधरी - कौशल्य विकास

राज्यमंत्री
३७ जितिन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी 
३८ श्रीपाद येसो नाईक - ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा.
३९ पंकज चौधरी - अर्थ
४० कृष्ण पाल - सहकार
४१ रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण.
४२ राम नाथ ठाकूर - कृषी आणि शेतकरी कल्याण
४३ नित्यानंद राय - गृह 
४४ अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते.
४५ व्ही सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे.
४६ चंद्रशेखर पेम्मासानी - ग्रामविकास डॉ. कम्युनिकेशन्स.
४७ प्रा.एस.पी.सिंग बघेल - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि डेअरींग. पंचायती राज
४८ शोभा करंदलाजे - एमएसएमई. श्रम आणि रोजगार
४९ कीर्तिवर्धन सिंह - पर्यावरण, वन आणि हवामान बदल. परराष्ट्र व्यवहार
५० बीएल वर्मा - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
५१ शंतनू ठाकूर - बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग
५२ सुरेश गोपी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन
५३ डॉ एल मुरुगन - माहित व प्रसारण, संसदीय कामकाज
५४ अजय टमटा - रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज
५५ बंदी संजय कुमार - गृह व्यवहार
५६ कमलेश पासवान - ग्रामविकास
५७ भगीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण.
५८ सतीशचंद्र दुबे - कोळसा आणि खाणी
५९ संजय सेठ - संरक्षण
६० रवनीत सिंग - फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, रेल्वे
६१ दुर्गादास उईके - आदिवासी व्यवहार.
६२ रक्षा निखिल खडसे - युवक कार्य व क्रीडा.
६३ सुकांता मजुमदार - शिक्षण, उत्तर पूर्व 
६४ सावित्री ठाकूर - महिला व बालविकास.
६५ तोखान साहू - गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार.
६६ राजभूषण चौधरी - जलशक्ती.
६७ भूपती श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग, पोलाद
६८ हर्ष मल्होत्रा - ​​कॉर्पोरेट अफेअर्स, रस्ते विकास
६९ निमुबेन बांभनिया ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण.
७० मुरलीधर मोहोळ सहकार्य, नागरी विमान वाहतूक.
७१ जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय.
७२ पवित्रा मार्गेरिटा - परराष्ट्र व्यवहार, कापड


amol mitkari and eknath khadse said on abu azmi controversial statement
अबू आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरी आणि एकनाथ खडसे काय म्हणाले?

अबू आझमींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.

Ishwari Kuge

अबू आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरी आणि एकनाथ खडसे काय म्हणाले

मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा आझमींनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.

अमोल मिटकरी म्हणाले:

'ऐन वारीच्या वेळेवर अबू आझमी यांचं आलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे', अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी केली. 'अबू आझमी यांना वारकरी संप्रदायाबद्दलचं ज्ञान नसल्याने त्यांनी आधी वारकरी संप्रदायाबद्दल अभ्यास करावा', असं देखील पुढे मिटकरी म्हणाले.

हेही वाचा: 'शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी...' - मंत्री गुलाबराव पाटील

काय म्हणाले एकनाथ खडसे?

अबू आझमींच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, 'अबू आझमी जे भाष्य करतात ते वादग्रस्त असतं. ते अतिरेकी आणि धर्माशी जोडलेली विधाने करतात'. पुढे खडसे म्हणाले की, 'नमाज पठणाला कोणीही विरोध केला नाही, आणि पांडुरंगाच्या वारीला देखील केला नाही. या देशात आणि राज्यात दोन्ही समाज एकत्र नांदत असताना राजकारण्यांच्या सोयीसाठी काही लोक वेगवेगळे वक्तव्य करत आहेत'.

हेही वाचा: ABU AZMI CONTROVERSY: पालखी सोहळ्याबाबत अबू आजमींनी केले वादग्रस्त वक्तव्य

अबू आझमी म्हणाले:

रस्त्यावर होणाऱ्या उत्सवांबद्दल कोणत्याही मुस्लिमाने कधीही तक्रार केलेली नाही. पण जेव्हा मशीद पूर्ण भरते, तेव्हा मशीदीतल्या काही लोक रस्त्यावर 5 ते 10 मिनिटे नमाज पठण करतात. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, ''रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू''. पुण्याहून येताना लोकांनी मला लवकर निघायला सांगितले, अन्यथा पालखीमुळे रस्ता बंद होईल. रस्ता बंद आहे, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही. मात्र रस्त्यावर नमाज केल्यास लगेच तक्रार केली जाते', असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.