नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ईव्हीएमद्वारे सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भातील सर्व याचिका रद्द केल्या आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान आणि व्हीव्हीपॅटशी ताडून गणना करण्याची याचिका पण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. चिन्ह लोड झाल्यावर प्रत्येक ईव्हीएम पुढील ४५ दिवस सील ठेवावे, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.