अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५३.७६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात आणि सर्वात कमी मतदान हिंगोली लोकसभा मतदारसंघात झाले.
महाराष्ट्रात संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
एकूण ५३.७६
वर्धा ५६.६६
अकोला ५२.४९
अमरावती ५४.५०
बुलढाणा ५३.२९
हिंगोली ५२.०३
नांदेड ५३.५३
परभणी ५३.७९
यवतमाळ - वाशिम ५४.०४
देशात कुठे किती मतदान ?
महाराष्ट्रासह भारतातील तेरा राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. मध्य प्रदेशातील बैतूल लोकसभा मतदारसंघात बसपा उमेदवार अशोक भलावी यांचे निधन झाल्यामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. उर्वरित ८८ मतदारसंघात मतदान झाले.
आसाम - ७०. ६८
बिहार - ५४.४०
छत्तीसगड - ७२. ५१
जम्मू काश्मीर - ६९.८६
कर्नाटक - ६४.६३
केरळ - ६५.२३
मध्य प्रदेश - ५५.५२
महाराष्ट्र - ५३. ७६
मणीपूर - ७७.१८
राजस्थान - ६२.०६
त्रिपुरा - ७८.५३
उत्तर प्रदेश - ५३.३९
पश्चिम बंगाल - ७१.८४