नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली नाही म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) फटकारले आहे. केजरीवाल सरकारला केवळ सत्तेत राहण्यातच रस आहे आणि अटक होऊनही राजीनामा न दिल्याने अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिल्याचे दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले.