Saturday, March 07, 2026 05:54:34 AM

प्रेमाचा खेळखंडोबा! आधी होणाऱ्या जावयासोबत पलायन, नंतर दागिने आणि पैसे घेऊन बहिणीच्या नवऱ्यासोबत पसार; त्या महिलेचा शोध सुरू

एका महिलेनं आधी जावयासोबत आणि नंतर भावोजींसोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रेमाचा खेळखंडोबा आधी होणाऱ्या जावयासोबत पलायन नंतर दागिने आणि पैसे घेऊन बहिणीच्या नवऱ्यासोबत पसार त्या महिलेचा शोध सुरू

अलिगड : लग्न संस्थेच्या परंपरेला छेद देणारी घटना अलिगडमध्ये घडली आहे. एका महिलेनं आधी जावयासोबत आणि नंतर भावोजींसोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लग्न संस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अलिगडच्या मंद्रक भागातील 40 वर्षीय महिला सरिता, ही 6 फेब्रुवारी रोजी नियोजित लग्नाच्या फक्त नऊ दिवस आधी तिचा 20 वर्षीय जावई राहुलसोबत पळून गेली होती. तिने 2.5 लाख रुपये रोख आणि दागिनेही सोबत घेतले होते. हा धक्कादायक प्रकार तिथेच थांबला नाही. तर काही महिन्यांनंतर, महिलेवर आता पुन्हा एकदा त्या तरुणाला सोडून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावेळी ती तिच्या भावोजींसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. 2 लाख रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तूंसह या महिलेने पलायन केले आहे. या विचित्र घटनेने दोन्ही कुटुंबं स्तब्ध झाली आहेत. तसेच पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 

हेही वाचा : Pune MIT College: पुण्यातील महाविद्यालयात फूड फेस्टिवलवरून तणाव; विद्यार्थ्यांनी जाळले बांगलादेशी झेंडे

जावई असलेल्या राहुलने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठवड्यात परिस्थितीत नाट्यमय वळण आले. त्याने आरोप केला की 6 फेब्रुवारी रोजी तो कामावर असताना सरिता घराबाहेर पडली. त्याच्या मते, ती एकटी नव्हती, ती तिच्या भावोजींसोबत निघून गेली, असे म्हटले समजते. राहुलने पुढे असा दावा केला की, गायब होण्यापूर्वी या जोडप्याने जवळजवळ 2 लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने सोबत घेतले होते. सरिता आणि राहुल यांच्यातील नातेसंबंध जवळजवळ दहा महिन्यांपूर्वी अनपेक्षित परिस्थितीत सुरू झाल्याचे वृत्त आहे. सरिताने तिच्या मुलीचे लग्न राहुलशी ठरवले होते. परंतु लग्नाच्या होण्याच्या कालावधीत भावी जावयाचे आणि सासूचे सूत जुळले. त्यांच्यात जवळीक, प्रेमसंबंध निर्माण झाले.

पोलिसांनी सांगितले की लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. तयारी सुरू होती. तथापि, रविवारी रात्री राहुल लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी जात असल्याचा दावा करून घरातून निघून गेला. काही तासांनंतर त्याने त्याच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की, "मी जात आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका." त्याच वेळी, सरिता देखील तिच्या कुटुंबाला न सांगता गायब झाली. नंतर दोघे सीतामढीला गेले. जिथे ते एकत्र राहू लागले.

अलिगडमधील पोलीस अधिकारी या तक्रारीची चौकशी करत आहेत. जरी संमतीने प्रौढांमधील पळून जाणे हे सामान्यतः वैयक्तिक बाब मानले जात असले तरी, रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेल्याच्या आरोपांमुळे अधिकाऱ्यांना या प्रकरणाची अधिक बारकाईने चौकशी करावी लागली आहे. सरिता आणि तिचा कथित नवीन जोडीदार अद्याप सापडले नाही. 


सम्बन्धित सामग्री