Thursday, May 22, 2025 09:43:07 PM

अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिलेवर चाकूहल्ला; आरोपींना वापी पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुलांना आणण्यासाठी ही महिला मुंबईतून इंदूरला प्रवास करत होती. मात्र, या प्रवासादरम्यान त्या महिलेचा तिच्याच डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यामध्ये झाले.

अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिलेवर चाकूहल्ला आरोपींना वापी पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई: मुंबईतून इंदूरकडे निघालेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये एका प्रवासी महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या मुलांना आणण्यासाठी ही महिला मुंबईतून इंदूरला प्रवास करत होती. मात्र, या प्रवासादरम्यान त्या महिलेचा तिच्याच डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद सुरू झाला आणि काही क्षणांत या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यामध्ये झाले.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मुंबईतून इंदूरला प्रवास करत होती. तेव्हा रेल्वे डब्यामध्ये असलेल्या काही प्रवाशांसोबत त्या महिलेचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यामध्ये झाले. इतकंच नाही तर, त्या महिलेवर मारहाण करून तिच्या हातापायावर धारदार चाकूने वार करण्यात आले होते. घडलेल्या या हल्ल्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली. त्यामुळे, क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा: 21 मेपासून रिक्षा संघटनांचं आंदोलन; प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन

आरोपींविरोधात पालघर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल:

या घटनेनंतर, पालघर स्टेशनवरील पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि संबंधित प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू करताच, त्यांनी माहिती मिळाली की आरोपींना वापी येथे पकडण्यात आले असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

विविध गंभीर कलमांखाली अटक केलेल्या या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळ, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे आणि नेमकं कोणत्या कारणामुळे त्या महिलेवर इतका भयानक हल्ला केला असावा आणि इतर कोणी साथीदार यामध्ये सहभागी आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जातील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री