Wednesday, May 21, 2025 02:31:43 PM

स्वामी योचं भविष्य ठरलं खरं? रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आधीच स्वामींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चं भाकीत

स्वामी यो हे काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या प्रसिद्ध पॉडकास्टवर सहभागी झाले होते. त्या चर्चेत त्यांनी सांगितलं होतं की, मे महिन्यात ग्रहांची अशी एक अनोखी स्थिती तयार होणार आहे.

स्वामी योचं भविष्य ठरलं खरं रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आधीच स्वामींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चं भाकीत

मुंबई: भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतला. या संयुक्त कारवाईत भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल यांनी समन्वय साधत हल्ला केला. मात्र या घटनेच्या आधीच काही जणांनी अशा मोठ्या कारवाईचा अंदाज वर्तवला होता. यातील एक नाव म्हणजे ‘स्वामी यो’. (swami yogeshwarananda giri) रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी मे महिन्यात युद्धासारखी मोठी घडामोड होणार असल्याचं सूचित केलं होतं. आता या व्हिडिओवर चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे.

स्वामी यो हे काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या प्रसिद्ध पॉडकास्टवर सहभागी झाले होते. त्या चर्चेत त्यांनी सांगितलं होतं की, मे महिन्यात ग्रहांची अशी एक अनोखी स्थिती तयार होणार आहे, जी महाभारतकालीन युद्धासमयीदेखील दिसली होती. या ग्रहयोगामुळे मोठ्या घडामोडी घडू शकतात, असं ते म्हणाले होते. त्यांनी दिलेली वेळ आणि भारतीय सैन्याच्या कारवाईची वेळ एकत्र पाहता, नेटकऱ्यांचं लक्ष लगेच तिकडे गेलं. आता अनेकजण म्हणत आहेत की, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं अचूक भाकीत केलं होतं.

पॉडकास्टमध्ये रणवीरने स्वामी यांना थेट विचारलं की, जगात महायुद्धाची शक्यता आहे का? यावर स्वामी यो म्हणाले होते की, 25 मेच्या सुमारास सहा ग्रह एकत्र एका विशिष्ट स्थितीत असतील, ज्यामुळे अशा ऐतिहासिक घटनांचं पडसाद उमटू शकतात. त्यांच्या मते, हे भारतासाठी ‘सुवर्णकाळ’ ठरेल आणि मोठ्या विजयाची नांदी ठरेल. आता ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे हे विधान आणखी गडद होतंय. त्यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्वामी यो आहेत तरी कोण? त्यांचं पूर्ण नाव स्वामी योगेश्वरानंद गिरी आहे. ते एक आध्यात्मिक गुरु असून ‘स्वामी यो’ नावाने यूट्यूबवर आपलं चॅनल चालवतात. ध्यान, योग आणि अध्यात्म यावर मार्गदर्शन करणारे ते व्हिडिओ सातत्याने अपलोड करतात. त्यांच्या मते, भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीरदेखील पुन्हा भारतात सामील करेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यांची भविष्यवाणी यामुळे त्यांच्याबद्दल आता कुतूहल अधिक वाढले आहे.

 

'>http://
 


सम्बन्धित सामग्री






Live TV