Friday, March 13, 2026 07:30:02 AM

Plane Crash: विमान अपघातांची मालिका काही संपेना! 7 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात; टेकऑफनंतर काही मिनिटांतच…

झारखंडमध्ये रुग्णवाहू विमान कोसळलं, 7 प्रवाश्यांसह टेकऑफनंतर संपर्क तुटला.

plane crash विमान अपघातांची मालिका काही संपेना 7 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात टेकऑफनंतर काही मिनिटांतच…

Plane Crash: झारखंडमध्ये एका चार्टर एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानात गंभीर अवस्थेत असलेला रुग्ण, मेडिकल टीम आणि पायलटसह एकूण सात जण प्रवास करत होते. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झालेल्या या विमानाचा संपर्क टेकऑफनंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुटल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, RAPL कंपनीच्या बीचक्राफ्ट किंग एयर C90 (VT-AJV) विमानाने संध्याकाळी 7:11 वाजता रांचीहून दिल्लीसाठी टेकऑफ केला. मात्र 7:34 वाजताच्या सुमारास विमानाचा संपर्क अचानक तुटला. त्यानंतर विमानाचा कोणताही संकेत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी मिळाला नाही. रात्र्री 8:05 वाजता शोध मोहीमेचा अलर्ट जाहीर करण्यात आला आणि रांची सरकारने घटनास्थळावर त्वरित शोध मोहिमा हाती घेतल्या.

विमान कोसळलेले ठिकाण झारखंडमधील लातेहार आणि पलामू जिल्ह्यांच्या मधल्या घनदाट जंगलात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या भागात ढगाळ हवामान, जोरदार वारे आणि पाऊस असल्यामुळे शोध मोहिमेस अडथळा येत आहे. यामुळे घटनास्थळावर पोहोचणे आणि विमानातील प्रवाशांचा शोध घेणे कठीण झाले आहे.या अपघातात एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. विमानात प्रवास करणाऱ्या गंभीर रुग्णाची अवस्था, मेडिकल टीम आणि पायलट यांची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे विमानसेवेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या विमानाने उड्डाण भरल्यानंतर डोंगराळ आणि घनदाट जंगलातून जात असताना अचानक हवामान खराब झाल्याचा अंदाज आहे. तांत्रिक बिघाड किंवा खराब दृश्यतेमुळे विमानाचा मार्ग चुकल्याचा देखील शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम्स घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र दुर्गम भाग असल्यामुळे शोध मोहिमा धीम्या गतीने चालू आहे. या अपघातामुळे विमानसेवेतील सुरक्षा निकष, अपात्कालीन व्यवस्थापन आणि चार्टर फ्लाइट्समधील तांत्रिक तपासणी यावर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकांना हा प्रकार गंभीरतेने समजून घ्यावा लागेल, तर प्रशासन देखील शोध मोहिमा जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

शोध मोहिमेमध्ये स्थानिक प्रशासन, रेस्क्यू टीम्स आणि हवाई दल सक्रिय आहेत. लोकांना अपघातस्थळी जाण्याचा सल्ला दिला जात नाही. तसेच, प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या काही तासांत परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हा अपघात देशभरातील विमानसेवा आणि आपत्कालीन रुग्णवाहू सेवांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर इशारा ठरला आहे. नागरिक आणि प्रशासन दोन्ही यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.


सम्बन्धित सामग्री