Friday, May 16, 2025 12:55:43 PM

भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल! मोदी सरकारचा मोठा निर्णय

आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल आणि याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल,' असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे.

भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल मोदी सरकारचा मोठा निर्णय
PM Modi
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव सतत वाढत आहे. पाकिस्तानकडून सतत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत. परंतु, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सर्व कारवाया अयशस्वी करत आहे. बुधवारी रात्रीपासून पाकिस्तान भारतावर सतत ड्रोन हल्ले करत आहे. दरम्यान, आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल आणि याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल,' असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे. 

भारताच्या प्रतिउत्तरामुळे पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनोबल खचले आहे. जर भारताने पुढील हल्ले थांबवले तर पाकिस्तान तणाव कमी करण्याचा विचार करेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने आणखी हल्ले थांबवले तर पाकिस्तान तणाव कमी करण्याचा विचार करेल. तथापि, जर भारताने आणखी हल्ले केले तर आम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ, असे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा - भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान संतापला - 

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांना ठार मारले. यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील 9 पाकिस्तानी ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादी मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सैन्य घाबरले.

हेही वाचा - Fact Check: भारतीय महिला पायलट शिवांगी सिंगला पकडल्याबद्दल बातम्या खोट्या; PIB कडून अफवांचे खंडण

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी शत्रू देशाने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. यानंतर, गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून 400 हून अधिक ड्रोन हल्ले करण्यात आले. तथापि, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व ड्रोन नष्ट केले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 


सम्बन्धित सामग्री