Pahalgam terrorist attack
Edited Image
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की, हाशिम मुसा, तल्हा भाई पाकिस्तानी दहशतवादी, 15 एप्रिल रोजीच पहलगाम येथे पोहोचला होता. हा हल्ला करण्यात 15 OGW ने मदत केली. तपासात असे दिसून आले आहे की ज्या दहशतवादींनी ही घटना घडवली ते 15 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पोहोचले होते.
तपासादरम्यान धक्कादायक खुलासा -
तथापि, पहलगाम व्यतिरिक्त, दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर आणखी तीन ठिकाणे होती. सर्वप्रथम त्याची योजना गुलमर्गमध्ये दहशत निर्माण करण्याची होती. परंतु, तेथे सुरक्षा रक्षक तैनात असल्याने दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरकडे वळावे लागले, जिथे दहशतवाद्यांनी लष्करचा दहशतवादी आदिल ठोकरसह ही घटना घडवून आणण्याचा कट रचला. ज्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे त्यांची नावे आसिफ फौजी उर्फ हाशिम मुसा उर्फ सुलेमान, अली भाई उर्फ तल्हा भाई अशी आहेत. दोघेही पाकिस्तानचे रहिवासी आहेत. तसेच आदिल हुसेन ठोकर हा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे.
हेही वाचा - पाकिस्तानची तारांबळ उडणार! भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात तात्काळ थांबली
दहशतवाद्यांनी केला सॅटेलाइट फोनचा वापर -
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी सॅटेलाइट फोनचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांनी कुकरनागच्या जंगलात आपला तात्पुरता तळ बनवला होता. या हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसा काश्मीरमध्येच लपून बसला आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला होता, पण 15 OGW ने दहशतवाद्यांना मदत केली.
हेही वाचा - अतुलशास्त्री भगरे यांची धक्कादायक भविष्यवाणी; येत्या 36 तासांत भारत-पाकिस्तान युद्ध?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानला अनेक मार्गांनी राजकीय पेचात अडकवले आहे. आज भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घातली आहे.