झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्या लोकांचे म्हणणे होते. मात्र, तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. त्यामुळे तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिचा पती आणि सासरच्यांनी तिची हत्या केली आहे. या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीनेही असं सांगितलं की, तिच्या वडिलांनी तिच्या आईला मारलं. झाशीच्या कोतवाली परिसरातील शिव परिवार कॉलनी परिसरात ही घटना घडली.
विवाहितेच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप केला. मात्र, सासरच्या लोकांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव केला. पण या महिलेच्या पाच वर्षांच्या मुलीने वहीत रेखाटलेले एक चित्र महत्त्वाचा पुरावा ठरले असून यातून सदर खुनाचा उलगडा झाला. 27 वर्षीय सुनेचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करून खून केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लोकांना ही आत्महत्या वाटावी, म्हणून सदर महिलेचे शव दोरीला लटकविण्यात आले.
हेही वाचा - ‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस
महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, तिचा विवाह 2019 मध्ये झाशी येथील रहिवासी संदीप बुधौलियाशी झाला होता. महिलेचे वडील संजीव त्रिपाठी यांनी दावा केला की, त्यांच्या कुटुंबाने हुंडा म्हणून 20 लाख रुपये रोख आणि इतर भेटवस्तू दिल्या होत्या. मात्र, लग्नानंतर लगेचच पीडितेच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबाने अधिक हुंडा आणि गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली.
जेव्हा त्यांची मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा त्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा संजीव त्रिपाठी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, परंतु, तडजोड झाल्यानंतर प्रकरण मिटले. ते म्हणाले, 'लग्नाच्या दिवशी मी त्यांना 20 लाख रुपये रोख हुंडा म्हणून दिले, पण त्यानंतर लगेचच संदीप आणि त्याच्या कुटुंबाने गाडीची मागणी करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितले की, मी ते देऊ शकत नाही. तेव्हापासूनच त्यांच्या विवाहित मुलीचा सासरच्या लोकांनी छळ सुरू केला.'
मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारले
मुलीच्या वडिलांनी सांगितले, 'पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती, पण नंतर आम्ही तडजोड केली. नंतर या जोडप्याला एक मुलगी झाली. परंतु, यानंतर पुन्हा मुलीला त्रास देण्यास सुरुवात झाली. मुलगा न झाल्याबद्दल महिलेच्या सासरच्या लोकांनी तिला टोमणे मारले. जेव्हा मुलीला मुलगी झाली, तेव्हा मुलगा न झाल्याबद्दल त्यांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली.' 'प्रसूतीनंतर, सासरचे लोक मुलीला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून निघून गेले. मी रुग्णालयाचे बिल भरले आणि तिला घरी आणले.' असे त्रिपाठी यांनी सांगितले.
वृत्तानुसार, महिलेच्या सासरच्या लोकांनी तिच्या आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, तिच्या 4 वर्षांच्या मुलीच्या सांगण्यावरून भयंकर खुनाचा उलगडा झाला. या लहान मुलीने जे पाहिले होते, त्या प्रसंगाचे वर्णन केले. शिवाय, कागदावर चित्रही रेखाटून दाखवले. ती मुलगी म्हणाली, 'पप्पांनी मम्मीला मारलं, तिच्या डोक्यात त्यांनी दगड मारला. नंतर पप्पांनी तिला दोरीने फासावर लटकवलं आणि नंतर तिला पोत्यात भरून फेकून दिलं.' 'पप्पांनी आदल्या दिवशीही मम्मीला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला सांगितलं की, जर तू माझ्या आईला मारलेस तर मी तुझे हात तोडून टाकीन. तरीही तो तिने मरून जावे यासाठी तिला मारत राहिला आणि त्याने माझ्यासोबतही तेच केले.'
हेही वाचा - व्हॅलेंटाईन डे पूर्वी अपघात.. तलावात होता तरुणीचा मृतदेह, मित्र म्हणाला हे 'ऑनर किलिंग'
पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला
मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. सध्या मृत विवाहितेचा पती फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी शोध सुरू आहे. 'कोतवालीच्या शिव परिवार कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला,' असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तिच्या माहेरकडच्यांनी तिच्या पती आणि सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला आहे आणि औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू ठेवू.'