मुंबई: पाहलगाममधील अमानवी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. 7 मे ला म्हणजेच मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायुदलाने हवेतून अचूक स्ट्राईक करत नऊ दहशतवादी छावण्यांचा नायनाट केला. ही कारवाई केवळ अतिरेक्यांच्या ठिकाणांवर केंद्रित होती, जेणेकरून कोणताही निष्पाप पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करी ठिकाण लक्ष्य ठरणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला आहे. याच पार्शवभूमीवर जगभरात चर्चा होताना पाहायला मिळतंय कोणी भारताला पाठींबा देतंय तर कोणी नकारात्मक भूमिका मांडतंय.
ऑपरेशन सिंदूर'बद्दल जगभरातून प्रतिक्रिया:
'भारतानं सकाळी केलेली लष्करी कारवाई दु:खद आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतील. ते दोघं चीनचेही शेजारी आहेत.
चीन कुठल्याही रूपातल्या दहशतवादाला विरोध करतो. दोन्ही बाजूंनी शांतता, स्थिरता यांचा व्यापक विचार करून संयम बाळगावा आणि ही परिस्थिती
7 आणखी गुंतागुंतीची बनेल असं पाऊल उचलणं
प्रवक्ते, चीन परराष्ट्र मंत्रालय
'हे खेदजनक आहे. आम्ही आत्ताच, ओव्हल ऑफिसमध्ये येत असतानाच याविषयी ऐकलं. मला वाटतं, भूतकाळाकडे पाहिलं तर असं काहीतरी होईल
याची लोकांना कल्पना होती. भारत-पाकिस्तान बर्याच काळापासून लढत आहेत. ते बऱ्याच दशकांपासून आणि विचार केला तर शतकांपासून
'भांडत आहेत. मला आशा आहे की, हे लवकर संपेल.'
डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
'कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या नियंत्रणाखालील भूमीवरून त्यांच्याविरुद्ध दहशतवादी हल्ले करणं स्वीकारावं लागू नये. दहशतवादी पायाभूत सुविधांवर
हल्ला करण्यासाठी भारताचं समर्थन आहे. दहशतवाद्यांना शिक्षेची माफी देता येऊ शकत नाही.'
ऋषि सुनक, माजी पंतप्रधान युनायटेड किंग्डम
'भारत आणि पाकिस्तानमधला लष्करी संघर्ष जगाला परवडणारा नाही. नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईमुळे
आम्हाला तीव्र चिंता वाटते आहे. दोन्ही देशांनी जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करतो.'
अँटोनियो गुटेरस, संयुक्त राष्ट्राचे महासचिव
'इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवाद्यांना हे माहित असले पाहिजे की निष्पाप लोकांविरुद्ध त्यांनी केलेल्या अक्षम्य
गुन्ह्यांपासून ते वाचू शकत नाहीत.'
रुवेन अझर, इस्रायलचे भारतातील राजदूत