Pakistan violates ceasefire प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (LoC) सतत गोळीबार करत आहे. आज 1 मे रोजी सलग सातव्या दिवशी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. कोणत्याही चिथावणीशिवाय, पाकिस्तानी सैन्य जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागातील भारतीय चौक्यांना लक्ष्य करून नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार करत आहे. भारतीय सैन्य त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर -
भारतीय सैन्याने सांगितले की, 30 एप्रिल ते 1 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय लष्करानेही याला योग्य प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून जम्मू-काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा - भारतीय नौदलाच्या हालचालींमुळे पाकिस्तानची झोप उडाली; हल्ल्याच्या भीतीने देशात भीतीचे वातावरण
पाकिस्तानला युद्धबंदी उल्लंघनाविरुद्ध इशारा -
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला युद्धबंदी उल्लंघनाविरुद्ध इशारा दिला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर 24 एप्रिल 2025 पासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवरील विविध ठिकाणी अकारण गोळीबार करत आहे.
हेही वाचा - पहलगाम हल्ल्याबाबत मोठी बातमी! दहशतवाद्यांनी आठवड्यापूर्वी केली होती अनेक पर्यटन स्थळांची रेकी
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या विनाकारण गोळीबारानंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) हॉटलाइनवर चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानला युद्धबंदी उल्लंघनाबद्दल कडक इशारा दिला आहे.