Saturday, March 07, 2026 02:14:17 AM

Helicopter Crash: भयंकर ! बघता बघता समुद्रातच कोसळलं हेलिकॉप्टर ; 7 जणांचा...

वैमानिकाने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर गर्दीच्या ठिकाणी न उतरवता समुद्रात नियंत्रित पद्धतीने उतरवण्याचा प्रयत्न केला.

helicopter crash  भयंकर  बघता बघता समुद्रातच कोसळलं हेलिकॉप्टर  7 जणांचा

Pawan Hans Helicopter Crash: पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जाणारे पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर काही वेळातच अंदमान समुद्रात कोसळले. या भीषण अपघातातून पाच प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्ससह सर्व सात जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे. वैमानिकाने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर गर्दीच्या ठिकाणी न उतरवता समुद्रात नियंत्रित पद्धतीने उतरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सध्या सर्व प्रवाशांना मायाबंदरमधील डॉ. आरपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड; वैमानिकाचे धाडसी पाऊल
हेलिकॉप्टरने पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्परतेने हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्याचा (Controlled Landing) निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी सर्व सात जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून प्रवाशांना केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत, अशी माहिती पवन हंसच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.

प्रवाशांची ओळख आणि उपचार
या अपघातातील प्रवाशांची ओळख पटली असून यामध्ये रजिता देवी आणि त्यांचे मूल, कमल चौधरी दास, शिप्रा साहा आणि नंबी अम्मा यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी डॉ. आरपी रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वैमानिकदेखील पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा - India France Relations: राफेलच्या नव्या डीलमधून मोठी माहिती समोर; भारताच्या 'आत्मनिर्भर' स्वप्नांना फ्रान्सचा खो, नव्या रिपोर्टने उडवली खळबळ

पवन हंस कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण
या घटनेनंतर पवन हंस कंपनीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9:30 वाजता मायाबंदरजवळ ही लँडिंगची घटना घडली. कंपनीने स्पष्ट केले की उड्डाणादरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. "ही घटना अधिक गंभीर असू शकली असती, परंतु वैमानिकाचे धाडस आणि त्वरित राबवलेली बचाव मोहीम यामुळे मोठी दुर्घटना टळली," असे कंपनीने म्हटले आहे. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी आता उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री