Tuesday, May 20, 2025 04:15:39 PM

26/11चा मास्टरमाईंड तहव्वुर राणा एएनआयच्या ताब्यात; सुरक्षा वाढवण्यात आली, चौकशीला वेग

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा भारतात; एएनआयकडून सखोल चौकशी सुरू, सुरक्षा वाढवली, कोर्टात कुटुंबीयांशी संपर्कासाठी अर्ज.

2611चा मास्टरमाईंड तहव्वुर राणा एएनआयच्या ताब्यात सुरक्षा वाढवण्यात आली चौकशीला वेग

नवी दिल्ली: 2008 साली मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसैन राणाला भारतात आणल्यानंतर त्याच्यावर तपास एजन्सीने चौकशीचा धडाका सुरू केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (ANI)च्या मुख्यालयात राणाला ताब्यात ठेवण्यात आलं असून, तिथे गुरुवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असलेला राणा हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तो सध्या एएनआयच्या कोठडीत असून, एजन्सी त्याची सखोल चौकशी करत आहे. या चौकशीचा उद्देश म्हणजे 26/11च्या हल्ल्याच्या मागील संपूर्ण कटाचा तपशील मिळवणे आणि या कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेणे.

राणाला काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून भारतात सुपूर्त करण्यात आल आहे. त्याच्या विरोधात दहशतवादासंदर्भातील गंभीर आरोप आहेत. राणा हा एक माजी लष्करी डॉक्टर असून, त्याचे संबंध 26/11च्या हल्ल्याच्या मास्टरमाईंड डेव्हिड कोलमन हेडलीसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेडलीने चौकशीत राणाच्या सहभागाबद्दल माहिती दिली होती.
 

हेही वाचा: हल्ला करणारे मुस्लिम नाहीत तर ... पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट संतापला

दरम्यान, राणाने दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात अर्ज करून आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची परवानगी मागितली आहे. त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, राणा परदेशी नागरिक असून त्याला आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा मूलभूत हक्क आहे. त्याच्या कुटुंबाला त्याच्या सुरक्षेबाबत चिंता आहे.

एनआयएने मात्र या विनंतीला विरोध केला असून, सध्या चौकशी सुरू असल्यामुळे अशा संवादातून गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते, असा युक्तिवाद केला. विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंग या प्रकरणात शुक्रवारी निर्णय देणार आहेत. या अगोदर कोर्टाने एएनआयला(ANI) नोटीस पाठवून राणाच्या अर्जावर उत्तर मागवले होते.

26/11चा हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह आणि दहशतदायक घटनांपैकी एक होता. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. हल्लेखोर समुद्रमार्गे पाकिस्तानातून आले होते आणि त्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय, सीएसटी स्टेशनसह अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता.

एनआयएकडून होणारी ही सखोल चौकशी 26/11च्या पार्श्वभूमीवर मोठा तपास उघड करू शकते. राणाकडून मिळणारी माहिती हल्ल्याच्या अधिक खोल मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
 


सम्बन्धित सामग्री