Wednesday, January 15, 2025 05:28:30 PM

Voting Day
देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशात मतदान सुरू आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या टक्केवारीनुसार देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात आणि सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे.

देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात

नवी दिल्ली, २० मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशात ५६.६८ टक्के मतदान झाले. भारतात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये आणि सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाले. राज्यात सर्वाधिक मतदान दिंडोरीत आणि सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले. 

संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
 

भारत ५६.६८ टक्के
बिहार ५२.३५ टक्के
जम्मू काश्मीर ५४.२१ टक्के
झारखंड ६१.९० टक्के
लडाख ६७.१५ टक्के
महाराष्ट्र ४८.६६ टक्के
ओडिशा ६०.५५ टक्के
उत्तर प्रदेश ५५.८० टक्के
पश्चिम बंगाल ७३ टक्के

महाराष्ट्र ४८.६६ टक्के
भिवंडी ४८.८९ टक्के
धुळे ४८.८१ टक्के
दिंडोरी ५७.०६ टक्के
कल्याण ४१.७० टक्के
उत्तर मुंबई ४६.९१ टक्के
उत्तर मध्य मुंबई ४७.३२ टक्के
ईशान्य मुंबई ४८.६७ टक्के
वायव्य मुंबई ४९.७९ टक्के
दक्षिण मुंबई ४४.२२ टक्के
दक्षिण मध्य मुंबई ४८.२६ टक्के
नाशिक ५१.१६ टक्के
पालघर ५४.३२ टक्के
ठाणे ४५.३८


सम्बन्धित सामग्री