'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर झालं तर त्या सन्मानाची प्रतिष्ठा वाढेल' असं डॉक्टर मोनह भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजून देखील भारतरत्न जाहीर का झाला नाही? त्यासाठी वेळ का लागतोय? यावर मोहन भागवत म्हणाले की, "त्या समितीमध्ये मी नाहीय... पण जर कोणी भेटलं तर मी नक्की विचारेन... पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला काय नाही दिला काय, भारतरत्न मिळाला तर त्या सन्मानाची प्रतिष्ठा वाढेल, त्या सन्मानाशिवाय ते लाखो आणि करोडो लोकांच्या हृदयात सम्राट झाले आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे." स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का अद्याप का मिळाला नाही? या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.