Tuesday, November 18, 2025 09:51:40 PM

Health Tips: चपाती-भाजी खाल्ल्याने शुगर वाढते का? खाताना पाळावेत 'हे' सोपे नियम

लोकांना असा प्रश्न पडतो की चपाती-भाजी खाल्ल्याने साखर वाढते का?

health tips चपाती-भाजी खाल्ल्याने शुगर वाढते का खाताना पाळावेत हे सोपे नियम

Health Tips: भारतीय घरांमध्ये जेवण हा केवळ पोट भरण्याचा मार्ग नाही, तर तो परंपरा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. परंतु, आजकाल दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे लोकांना असा प्रश्न पडतो की चपाती-भाजी खाल्ल्याने साखर वाढते का? काही लोक फक्त ओट्स, डाळ किंवा फळांचे सेवन करतात, तर भात आणि पोळी टाळण्याचा प्रयत्न करतात. पण हे पुरेसे आहे का?

सर्वप्रथम हे लक्षात घ्या की भारतीय जेवण साधं दिसत असलं तरी त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. भात, पोळी, भाज्या आणि अगदी चहातही काही प्रमाणात साखर असते. शहरांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते कारण येथे जीवनशैली बसलेली आहे आणि शारीरिक हालचाल कमी आहे, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या समस्या वाढतात.

हेही वाचा: Health Tips: उपवासानंतर नारळ पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने काय परिणाम होईल?, जाणून घ्या...

खरंतर, चपाती-भाजीसुद्धा शुगर स्तरावर परिणाम करू शकते, पण योग्य पद्धतीने सेवन केल्यास हा प्रभाव नियंत्रित राहतो. विशेषज्ञांनी सांगितले आहे की, मधुमेही रुग्णांनी संतुलित आहाराचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 2 चपात्या, एक प्लेट भाज्या, थोडे दही आणि डाळ यांचा समावेश केलेला जेवण शरीरासाठी फायदेशीर ठरतो.

याशिवाय बाजरी, ज्वारी आणि मल्टीग्रेन पीठ वापरण्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित राहतो आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि फायबरयुक्त अन्नाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि साखर नियंत्रित राहते.

ताण, तासंदेखील अत्यंत महत्वाचा आहे. जास्त ताण, प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड हे आतड्यांचे संतुलन बिघडवतात, जे साखर, वजन आणि पचनावर प्रतिकूल परिणाम करतात. म्हणून मधुमेही रुग्णांनी सकाळी कोमट पाणी, भिजलेले मणुके आणि बदाम यांचा समावेश करावा.

जेवणानंतर 10-15 मिनिटांचा वॉक हा देखील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायक ठरतो. त्याचबरोबर गोड पदार्थ, मिठाई, साखरेचे पेये व जंक फूड टाळणे गरजेचे आहे. मानसिक ताण कमी करणे देखील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा: Dangerous Foods: सावधान! कितीही आकर्षक दिसत असले तरीही 'हे' पदार्थ म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण

याचा सरळ अर्थ असा की, चपाती-भाजी हे मधुमेही रुग्णांसाठी निषिद्ध नाहीत, फक्त सेवनाची योग्य पद्धत आणि प्रमाण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संतुलित आहार, नियमित चालणे, तणाव कमी करणे आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न टाळणे या सवयी रक्‍तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात.

एकंदरीत, भारतीय जेवणाचा आनंद घेता येतो, पण मधुमेही रुग्णांनी योग्य प्रमाण, संतुलन आणि शारीरिक हालचाल यावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीर निरोगी राहील आणि शुगर नियंत्रित राहण्यास मदत होईल.


सम्बन्धित सामग्री