Thursday, February 12, 2026 03:01:59 AM

Ajit Pawar Last Rites in Baramati : अजित पवारांना आज अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित

बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन; अंतिम दर्शन आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे, राज्यभर शोककळा पसरली

ajit pawar last rites in baramati  अजित पवारांना आज अखेरचा निरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित


 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या भयंकर विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी ते सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. दिवसभरात त्यांना चार महत्त्वाच्या सभांमध्ये उपस्थित राहायचे होते, मात्र विमान बारामती विमानतळावर लँडिंग करताना 8:40 च्या सुमारास कोसळले. अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले, यात अजित पवारांसह अन्य सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजित पवारांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कार्यकर्ते आणि नागरिक रडत, भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काहीजण म्हणत होते, ‘अमरा रहे… अजित दादा अमर रहे’, तर अनेकांनी ‘दादा तुम्ही परत या’ असे उद्रेक करीत आपल्या दुःखाचा सामना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अचानक जाण्याने होणाऱ्या रिकाम्या जागी हळहळ व्यक्त केली.

उपमुख्यमंत्र्यांचे पार्थिव , 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4:00 वाजल्यापासून बारामती येथील विद्याप्रतिष्ठान, विद्यानगरी चौकच्या मैदानावर नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. काचेची पेटी तयार करून पार्थिव ठेवण्यात आले होते, ज्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली. आज  29 जानेवारी रोजी सकाळी 9:00 वाजता गदिमा सभागृहापासून अंतिम यात्रा सुरू होईल. ही यात्रा गदिमा चौक आणि विद्यानगरी चौक मार्गे मैदानावर पोहोचेल, जिथे नागरिक आणि नेते त्यांना अखेरचा निरोप देतील.

शासकीय इतमामात अंतिम संस्कार सकाळी 11:00 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर होणार आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने पुण्यातून बारामतीत दाखल होऊन या कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते उपस्थित राहून आदरांजली देतील.

राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ 28 ते 30 जानेवारी 2026 या काळात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येईल. कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, 28 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली, तर बाजारपेठाही बंद ठेवून नागरिक श्रद्धांजली वाहत आहेत.

अजित पवार हे एक धडाडीचे, अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेते होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अपूरा भरून न येणारा नुकसान झाल्याचे सर्वत्र व्यक्त केले जात आहे. कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना अखेरच्या निरोपासाठी गर्दी करत असून, त्यांच्या योगदानाची आठवण करत राज्यभर शोक व्यक्त केला जात आहे.

या अपघाती निधनाने राज्यातील राजकीय वर्तुळ, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक अश्रू वाहत हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शन ठरेल अशी भावना व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री