Thursday, May 15, 2025 12:14:41 AM

माजी आमदार रामदास आंबटकर यांचं दुःखद निधन

भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवारी दुपारी चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरमध्ये निधन झाले.

माजी आमदार रामदास आंबटकर यांचं दुःखद निधन

वर्धा: भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवारी दुपारी चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरमध्ये निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. आंबटकर त्यांच्या किडनी संबंधित उपचारासाठी चेन्नई येथील एमजीएम हेल्थकेअरमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच, भाजप परिवारात आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

मंत्री गडकरींनी एक्सच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली:

'माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यासोबतच भाजपचे संघटन विदर्भात मजबूत करण्यासाठी डॉ. रामदास यांंनी कठोर परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी विद्यापीठात आवाज उठवला होता. ते एक कुशल संघटक आणि विचारधारेप्रती कायम समर्पित होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे विदर्भातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना', असे मंत्री गडकरींनी एक्सच्या माध्यमातून डॉ. रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. आंबटकर यांचा जीवनप्रवास:

भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. रामदास आंबटकर यांचा जन्म 1 जुलै 1960 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील वडनेर गावात झाला होता. लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांनी सलग तीन वेळा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आणि आयुष्यभर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि शिकवण खोलवर रुजवली. वडिलांकडून प्रेरणा घेऊन डॉ. आंबटकर यांनी राष्ट्र उभारण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असतानाच त्यांनी 1965 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन अगदी लहानपणापासूनच मोलाचे योगदान दिले.

डॉ. आंबटकर यांनी 1979 मध्ये यवतमाळ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत स्वयंसेवक झाले आणि त्यानंतर खंबीरपणे काम करू लागले. 1982 मध्ये डॉ. आंबटकर अभाविप यवतमाळ शहर सरचिटणीस, 1984 मध्ये अभाविपचे विस्तारक आणि पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. त्यानंतर, 1985 मध्ये ते अमरावती जिल्ह्याचे संघटन सचिव होते. 1987 मध्ये त्यांना अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि विदर्भ प्रदेश संघटन सचिव म्हणून बढती मिळाली आणि ते विकास कार्यात सहभागी झाले.

हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1985 मध्ये डॉ. आंबटकर यांनी पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर आरटीएम नागपूर विद्यापीठातून बीएएमएसचा अभ्यास सुरू केला. 1992 मध्ये त्यांनी बीए समाजशास्त्राचा अभ्यास केला. 1995 मध्ये आरटीएम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, तर 2000 मध्ये स्थायी समितीचे सदस्य झाले. 2004 मध्ये भाजप पक्षात अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे संघटन सचिव म्हणून काम केले आणि राजकारणाचा प्रवास सुरू केला. 2005 मध्ये आरटीएम नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य बनवले गेले. 2006 मध्ये पश्चिम विदर्भात पक्षाचा यशस्वी विस्तार करून 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य यश मिळविण्यासाठी धोरणे आखली.

महाराष्ट्रातील अनुभवी नेते प्राचार्य बी. टी. देशमुख यांना अमरावती मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी यशस्वी रणनीती आखल्या आणि प्रभावीपणे अमलात आणल्या. त्यामुळे डॉ. रणजित पाटील यांचा विजय झाला. 2015 मध्ये डॉ. आंबटकर यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि सध्या ते विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी) म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते.


सम्बन्धित सामग्री