महायुतीचे अखेर ठरले आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच झालेल्या भेटीत सविस्त्र चर्चा झालेली आहे. तिन्ही महानगरपालिकेमध्ये युतीला महायुतीला जनादेश मिळाला आहे त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेले महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
https://youtu.be/jSUcuAs4N-E