मुंबईत मेट्रो ३ (अॅक्वा लाईन) लाँच होऊन खूप काळ लोटला आहे. पण तरीही अनेक प्रवाशांना सबवेवर "नेटवर्क नसल्याच्या" समस्या येत आहेत. मेट्रोच्या उद्घाटनाच्या वेळी, संपूर्ण मार्गावर शक्य तितक्या लवकर मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण इतके महिने उलटूनही आणि नवीन वर्ष सुरू होऊनही, काही सिम कार्डना अजूनही नेटवर्क अॅक्सेस मिळालेला नाही.
एमएमआरसीएलने मेट्रो सुरू करताना सबवेवर नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, वरळी आणि कुलाबा दरम्यानच्या स्थानकांवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात नेटवर्क खंडित होत आहे. आरे जेव्हीएलआरपासून सुरुवातीच्या स्थानकांमध्ये मोबाइल सेवा सुरळीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. मात्र वरळी स्थानक ओलांडल्यानंतर अनेकांच्या मोबाइलवरील सिग्नल नाहीसे होतात.
हेही वाचा - Water Cut Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी 14 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या
'मेट्रोमुळे प्रवास जलद झाला असला तरीही वरळीपासून पुढे जवळपास 40 मिनिटे फोन लागत नाही. सध्या व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या सेवा पुरवठादारांचे मर्यादित नेटवर्क काही स्थानकांमध्ये उपलब्ध आहे. मात्र जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांना संपूर्ण मार्गावर अडचणींशी सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - Bhimashankar Jyotirlinga Temple: यंदाच्या महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले राहणार? समोर आली मोठी अपडेट
या सर्व समस्यांमुळे विद्यार्थी मेट्रोऐवजी बस किंवा लोकल रेल्वेचा पर्याय निवडत असल्याचेही समोर आले आहे.