भारतीय जनता पक्षाचे नवनाथ बन सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेदरम्याने ते म्हणाले की, राज ठाकरे यांना एकच विनंती करायची आहे. भाजप नेहमीच लोकांची सेवा करण्यात प्राथमिकता देते. जनतेची सेवा करणाऱ्यांना कधीच एक्सपायरी नसते याच कारणामुळे मोदीजी सलग तीनवेळा पंतप्रधान झाले. काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. जनता गांधी कुटुंबाला वैतागली होती. जनतेचे आशिर्वाद आहेत म्हणून राज ठाकरे यांनी कितीही इच्छा व्यक्त केली तरी आम्ही जनतेच्या आशीर्वादाने निवडून येऊ.
मनसे स्वीकृत नगरसेवक
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीत निवडणुकीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे यांचा स्वार्थीपणा पाहता ते स्वीकृत नगरसेवक पद देणार नाहीत. राज ठाकरे यांनी विनंती आहे की अशा लोकांसोबत राहायचे का? याचा विचार करावा.