महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडलं. या निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अशातच काल मतदानाच्या पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी EVM मशीन संदर्भात विविध बातम्या समोर आल्या. अशातच सोलापुरातील हॉटेलमध्ये EVM मशीन आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणूक अधिकारी सीमा होळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक EVM मशीन एका हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी आरोप केला आहे. उमेश पाटील यांनी केलेल्या आरोप केल्यानंतर EVM मशीन ताब्यात घेण्यात आल्या.