मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल आज आपल्या शतकपूर्तीचा सोहळा साजरा करत आहे. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस (आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला दरम्यान अवघ्या 4 डब्यांसह धावली होती. आज, 100 वर्षांनी, हीच लोकल कोट्यवधी प्रवाशांची नाळ बनली आहे.
मुंबई लोकलचा सुवर्णप्रवास
मुंबई लोकलने गेल्या शतकभरात प्रचंड बदल पाहिले. चार डब्यांपासून सुरू झालेला हा प्रवास 15 डब्यांच्या अत्याधुनिक लोकलपर्यंत पोहोचला आहे. आज लोकलमध्ये एसी डबेही समाविष्ट झाले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक झाला आहे.
हेही वाचा: Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार”, राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी
लोकलची वाढती क्षमता
• 1925 - 4 डब्यांची लोकल
• 1927 - 8 डब्यांची लोकल
• 1961 - 9 डब्यांची लोकल
• 1986 - 12 डब्यांची लोकल
• 2016 - 15 डब्यांची लोकल
• 2020 - 12 डब्यांची एसी लोकल
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुंबईकरांसाठी अभिमानाचा दिवस
मुंबई लोकलने केवळ प्रवास सुलभ केला नाही, तर शहराच्या वेगवान आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. रोज सुमारे 80 लाखांहून अधिक प्रवासी या रेल्वेसेवेचा वापर करतात. वाहतूक कोंडी, इंधनखर्च, आणि प्रदूषण कमी करण्यात लोकलचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा: सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार ?
भविष्यातील वाटचाल
आता मुंबई लोकल हायस्पीड रेल्वे, डिजिटल तिकीटिंग आणि स्वयंचलित दरवाजांसारख्या अत्याधुनिक सुविधांकडे वाटचाल करत आहे. येत्या काही वर्षांत, लोकलसेवा अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.