Friday, April 25, 2025 08:15:25 PM

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले

महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. यावर आता काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  यांनी प्रतिक्रिया दिलीय. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करु नये असंही सपकाळ म्हणालेत. 

हेही वाचा: तो आला अन् त्याने..; मराठमोळी अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय? 

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 
औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत असल्याचे सपकाळ म्हणाले. घाशीराम कोतवालप्रमाणे गृहविभाग चालतोय का? असा प्रश्न पडतो. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे. त्यामुळं ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय. औसंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असे म्हणत या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभर एकाच दिवशी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी  आंदोलन होणार असून सकरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ळी बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू अशा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे. 

त्यातच औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करु नये असंही सपकाळ म्हणालेत.  यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 


सम्बन्धित सामग्री