ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजात धुळवड साजरी केली. रंगांची उधळण करत यांनी विरोधकांवर टीका-टोमण्यांची बरसात केली. यावेळ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने बोंबा मारल्या. हा सण आता वैश्विक झाला आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सणाचा आनंद द्विगुणित झाला असल्याची प्रतिक्रियाही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
काय म्हणाले ॲड. गुणरत्न सदावर्ते
हिंदी शिकायची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर मी आता हिंदीतून कविता केली आहे. त्यांना ऐकावंच लागेल. होली आई रंगों वाली, बदल गई फिर चाल निराली। राज ठाकरे रंग बदलें, उद्धव संग मंच पे चढ़ लें। शरद पवार मुस्कान छुपाएँ, पुरानी चाल फिर दोहराएँ। एकनाथ शिंदे भी आए, कल की बातें भूल ही जाएँ। बुरा न मानो होली हैं!
इराणमध्ये मुलींना त्रास होता. हिजाब कम्पल्सरी करणारा पुढारी होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ज्या पद्धतीने मृत्यू केला आहे. यामुळे इराणच्या महिला जाचातून मुक्त झाल्या आहेत. महिलांसाठी आस्था घेऊन आल्या आहे. महाराष्ट्रातसुद्धा खामेनी यांच्या विचाराप्रमाणेच उद्धव ठाकरे राज्य करत होते. अशी बोचरी टीकाही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ज्या पद्धतीने इस्राईलच्या पंतप्रधानांनी केलं, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा राजकारण बूस्ट केलं आहे. हिसाब अभी बाकी है, बुरा ना मानो होली हैं, असेही ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
जो भारताच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने बहरत असेल. कोणत्याही हुकूमशाहा इथे चालणार नाही. ही युद्ध नाही हे मानवाधिकाराची लढाई आहे. महिलांच्या अन्यायावरची लढाई आहे. 13 वर्षांच्या चिमुकलीला लग्न करावं लागत होतं, शेम आहे. खामेनी काय कॅरेक्टर होते. त्यांच्याबद्दल कोणी सहानुभूती ठेवावी हा त्याचा त्याचा भाग आहे. मात्र महिलांच्या दृष्टिकोनातून या देशाला एक संस्कृती आहे. हुकुमशहा इराणमध्ये महिलाना त्रास देत होता. ह्यूमन राईट महत्त्वाचं आहे. मानवतेच्या विरोधातला हा पुढारी होता, जो मारला गेला. देश आणि सीमा मानू नका. धर्म माना अस ते सांगत होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे दुःख पाळण्याचे काही कारण नाही, असेही सदावर्ते यांनी नमूद केले.