Wednesday, May 14, 2025 10:52:52 PM

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्य्रात काढले मुसलमानांनी आंदोलन; जितेंद्र आव्हाड उपस्थित

मुंब्रा येथे समस्त मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनात उपस्थित होते.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्य्रात काढले मुसलमानांनी आंदोलन जितेंद्र आव्हाड उपस्थित

कुणाल भोईटे, प्रतिनिधी, मुंबई: मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्रा येथे समस्त मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनात उपस्थित होते. या आंदोलनात समस्त मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा आणि काळे झंडे घेऊन 'हिंदुस्तान जिंदाबाद', 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा जोरदार घोषणा देत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुंब्रा येथील मुस्लिम समाजाने तीव्र निषेध केला.

नमाज अदा केल्यानंतर दहशतवादी हल्ल्याचा निषेध

यादरम्यान, समस्त मुस्लिम समाजाने दुपारची नमाज अदा केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले.

हेही वाचा: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये बैलगाडा संघटना उतरली रस्त्यावर

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले

मुंब्रा येथे समस्त मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'दुपारची नमाज अदा केल्यानंतर समस्त मुस्लिम बांधव बाहेर आले आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात तीव्र आंदोलन केले. तब्बल 47 डिग्री तापमानात हे लोक निषेध नोंदवत आहेत. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे, खासकरून पाकिस्तान विरोधात. हे आंदोलन नसून लोकांचा उद्रेक आहे, आक्रोश आहे आणि त्यासोबतच लोकांच्या मनातील राग आहे'. 

आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारला धरले धारेवर

सरकारला धरत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आज काश्मीर येथील पहलगाम सारख्या भागात एकही सेना, अधिकारी किंवा एकही बंदूकधारी सैनिक नाही. तुम्ही लोकांना मरणाला सामोरे जाण्यासाठी पहलगामला पाठवलं होत का? पर्यटकांची गर्दी वाढतेय हे सरकारला माहिती नव्हतं? दहशतवादी हल्ला होऊ शकतो ही खबर गुप्तचर यंत्रणेला माहित नव्हती का? सरकार काय करत होत? सरकार झोपलं होत का?' 

आम्ही विचारलं की सरकारला संशय येतो

आम्ही विचारल्यावर तुम्हाला आमच्यावर संशय येतो, पण 26 लोकांच्या घरातील लोक विचारत आहेत की, 'जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा सेना कुठे होती?' डोंबिवलीच्या त्या बाईच, त्या बहिणीचं अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा वाचा फोडली. त्यांनी मला विचारलं की, 'मला सांगा सुरक्षा यंत्रणा कुठे होती?' तेव्हा मी त्यांना म्हणालो की, 'या प्रश्नाचं उत्तर सरकारलाच द्यावं लागेल'. 


सम्बन्धित सामग्री