नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे. दरम्यान, या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दहशतवादाच्या प्रकरणांची चौकशी करण्यात न्यायाधीश तज्ज्ञ नसतात, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकाकर्त्यांना फटकारले आणि विचारले की, त्यांना सुरक्षा दलांचे मनोबल खचवायचे आहे का? त्यांना असे मुद्दे न्यायालयीन क्षेत्रात आणू नयेत असे, सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की, या कठीण काळात देशातील प्रत्येक नागरिक दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकजूट आहे. 'जबाबदार रहा, देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे,' असे न्यायलयाने म्हटले.
हेही वाचा - '...मी सुइसाईड बॉम्बर म्हणून पाकिस्तानात जाईन,' कर्नाटकातील मंत्री जमीर खान यांचं वक्तव्य चर्चेत
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करणाऱ्या वकिलांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. "जबाबदार राहा. देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. असेच आहे का... कृपया असे करू नका. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अशा मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी कधीपासून तज्ज्ञ बनले आहेत? आम्ही काहीही ऐकत नाही आहोत," असे कोटीश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे म्हणाले, "ही एक महत्त्वाची वेळ आहे जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हातमिळवणी करत आहे. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे कोणाचेही मनोबल कमी होईल. प्रकरणाची संवेदनशीलता पाहा."
हेही वाचा - '..पाकिस्तानात जाण्यापेक्षा मेलेलं बरं!' तिथले नागरिक आणि J&K पोलीस दलात 27 वर्षे सेवा? हे कसं घडलं?