Attari-Wagah Border: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारने कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. दरम्यान, सर्व पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडून पाकिस्तानात परतण्यास सांगण्यात आले होते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत, अटारी सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराचे प्रकरण समोर आले आहे.
इमिग्रेशनचे दरवाजे सुमारे 2 तास उघडले नाहीत -
पाकिस्तानने भारतातून परतणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी इमिग्रेशनचे दरवाजे सुमारे 2 तास उघडले नाहीत. यामुळे अटारी सीमेवर भारतीय बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आणलेली पाकिस्तानी लोकांना घेऊन जाणारी बस बॅरिकेडमधून आत शिरली, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी इमिग्रेशन गेट उशिरा उघडले. त्यामुळे अटारी बोर्डावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा - भारताच्या दबदब्याने पाकड्यांची घाबरगुंडी; युद्धाच्या भीतीने मध्यरात्री पत्रकार परिषद
पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये -
आज पाकिस्तानकडून इमिग्रेशन गेट सुमारे 12 वाजता उघडण्यात आले, ज्यामुळे लोकांना उन्हात तासन्तास वाट पहावी लागली. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. भारतीय लष्कराला त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
हेही वाचा - पाकड्यांची सीमेवर कुरघोडी सुरुच; नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार
इस्लामाबाद आणि लाहोर नो-फ्लाय झोन म्हणून घोषित -
दरम्यान, पाकिस्तानचे अनेक नेते असा दावा करत आहेत की भारत कधीही पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारू शकतो. भीतीच्या वातावरणात, पाकिस्तान सरकारने आता स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने आपली दोन महत्त्वाची शहरे, इस्लामाबाद आणि लाहोर, नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केली आहे.