Wednesday, May 14, 2025 11:32:45 PM

Operation Sindoor: जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याचे 10 कुटुंबीय ठार

या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने त्याच्या ठार झालेल्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली आहे.

operation sindoor जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याचे 10 कुटुंबीय ठार

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 लपण्याच्या ठिकाणांवर रात्री हल्ले केले आणि बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मुख्यालयाला लक्ष्य केले. भारतीय सशस्त्र दलांनी बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा तळ यासह दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. येथे जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो.

या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने म्हटले आहे की, ठार झालेल्यांमध्ये त्याचा भाऊ, त्याची मोठी बहीण आणि तिचा पती, त्याचा पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि त्यांच्या कुटुंबातील पाच मुलेदेखील ठार झाली. यानंतर मसूद अझहरला दुःख झाले असून 'एवढे सगळे कुटुंबीय मरण्यापेक्षा मी मेलो असतो, तर बरे झाले असते,' असे त्याने म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Operation Sindoor Inside Story : PM मोदींनी मंजुरी दिली; पण हल्ल्याचा अंतिम निर्णय 'या' व्यक्तीने घेतला

विविध वृत्तांनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये 25 मिनिटांच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांना ठार मारले, असे सूत्रांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये मसूद अझहरची पत्नी, त्याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगर आणि त्याचा मुलगा होता. एका निवेदनात अझहरने म्हटले आहे की, मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण आणि तिचा पती, त्याचा पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले देखील मारली गेली. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी जवळून संबंधित असलेले चार सहकारी देखील या हल्ल्यात मारले गेले आहेत.

पत्रकार परिषदेत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 25 मिनिटे चाललेल्या कारवाईची माहिती माध्यमांना दिली. मिस्री म्हणाले की, ही कारवाई अत्यंत प्रमाणबद्ध आणि जबाबदार होती.

"हल्ल्याला पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानकडून त्यांच्या हद्दीतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर कारवाई करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्याऐवजी ते फक्त नकार आणि आरोप करण्यात गुंतले आहे," असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांना लक्ष्य केलं. यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख असलेला मसूद अझर हा भारताच्या हल्ल्यात ठार झाल्याची चर्चा होती. मात्र, तो जिवंत असून त्यानेच  पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने मसूद अझहर आणि हाफिज सईद यांना सुरक्षित ठिकाणी दाखल केल्याचे वृत्त होते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझर बचावला असल्याचे वृत्त आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात भारताने तीन दहशतवाद्यांची सुटका केली, त्यात मसूदचा समावेश होता. त्यानंतर त्याने जैशची स्थापना केली आणि भारतविरोधी कारवाया सुरू केल्या.

हेही वाचा - ''दहशतवादी हल्ल्याला युद्ध आणि एअर स्ट्राईक उत्तर नव्हे'' ''ऑपरेशन सिंदूर''वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

परिवारातील अनेकजण एकाच वेळी मारले गेल्यानंतर मसूद अझहरला त्याचे दुःख झाले असून 'एवढे सगळे कुटुंबीय मरण्यापेक्षा मी मेलो असतो, तर बरे झाले असते,' असे त्याने म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर 'तू आधीच मेला असतास तर, हे सर्वजण वाचले असते,' अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री