Monday, May 12, 2025 08:31:23 PM

Operation Sindoor Inside Story : PM मोदींनी मंजुरी दिली; पण हल्ल्याचा अंतिम निर्णय 'या' व्यक्तीने घेतला

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने 9 ठिकाणांवर एकूण 24 क्षेपणास्त्र डागली. पण इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला नव्हता. तर, तो दुसऱ्या एका व्यक्तीने घेतला होता.

operation sindoor inside story  pm मोदींनी मंजुरी दिली पण हल्ल्याचा अंतिम निर्णय या व्यक्तीने घेतला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने दहशतवाद्यांना योग्य शिक्षा दिली. भारतीय सैन्याने बुधवारी रात्री (7 मे 2025 रोजी) रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी या हल्ल्याला सुरुवात केली. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर अर्ध्या तासाच्या आत हे ऑपरेशन पूर्ण झालं. पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धच्या या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते.

दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमधील मुस्लीम नसलेल्या पुरुषांना लक्ष्य केले होते. यामुळे अनेक माय-बहिणींचे कुंकू आयुष्यभरासाठी पुसले गेले. यामुळे या दहशतवादविरोधी लष्करी कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यात भारताने 9 ठिकाणांवर एकूण 24 क्षेपणास्त्र डागली. पण पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नव्हता. तर, तो दुसऱ्या एका व्यक्तीने घेतला होता. पंतप्रधान मोदींना या हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन सांगण्यात आला होता आणि त्यांच्याकडून मंजुरी घेतली होती.

हेही वाचा - भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं? हल्ल्यादरम्यान किती दहशतवादी अड्ड्यांवर होते? वाचा सविस्तर

अंतिम निर्णय कोणी घेतला?
पंतप्रधान मोदींच्या मंजुरीनंतर एका व्यक्तीच्या अंतिम इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला. हा अंतिम निर्णय कुणी घेतला, ऑपरेशन सिंदूर कधी आणि कसे राबवले गेले? चला, जाणून घेऊ..
ऑपरेशन सिंदूर राबवण्याची सुरुवातीची जबाबदारी एनएसए प्रमुख अजित डोवाल यांनी घेतली. डोवाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली. या ऑपरेशनसाठी एक अतिशय मजबूत टीम तयार करण्यात आली होती. ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांबद्दल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी जी ठिकाणं बनवली होती, त्या सर्व ठिकाणांची खात्री पटवण्यात आली.

यानंतर, हल्ला करण्याची सर्व ठिकाणं निवडण्यात आली. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या सर्व ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले होते. हल्ल्यासाठी ठोस योजना तयार केल्यानंतर, एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या हल्ल्यात फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर, एनएसए अजित डोवाल यांची पुन्हा एकदा त्यांच्या कोअर टीमसोबत बैठक होऊन यात हल्ल्याची योजना पुन्हा एकदा अंतिम करण्यात आली.

हेही वाचा - भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'

या हल्ल्यात एनटीआरओला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. हल्ल्याच्या अंतिम प्लॅनसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी हल्ला करण्यास हिरवा कंदील दिला आणि डोवाल यांना अॅक्शन घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर, एका अतिशय लहान गटाला हल्ल्याची माहिती देण्यात आली. तसेच, एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या नियंत्रण कक्षाचे नेतृत्व आणि जबाबदारी पूर्णपणे एनएसए अजित डोवाल यांच्याकडे होती.

अजित डोवाल यांच्याकडून अंतिम सिग्नल मिळताच, भारतीय लढाऊ विमानं ऑपरेशन सिंदूर करण्यासाठी आकाशात झेपावली. मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी भारताने पाकिस्तानी भूमीवरील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. काही वेळातच दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त झाले आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला.


सम्बन्धित सामग्री