नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही केली आहे. शनिवारी, पाकिस्तानने अब्दाली या मिसाईलची प्रशिक्षण चाचणी घेतली होती. पाकिस्तानने या मिसाईलची जोरदार चर्चा सुरू ठेवली होती. एक्सरसाईज इंडसमध्ये देखील या मिसाईलला पाकिस्तानचे मोठे यश मानले गेले होते. त्यामुळे, या प्रशिक्षण चाचणीकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष होते. परंतु ही चाचणी फुस्स ठरली.
पाकची अब्दाली मिसाईल:
अब्दाली हा एक प्रकारची बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची रेंज 450 किलोमीटर आहे. शनिवारी, पाकिस्तान देशातील सोनमियानी रेंज येथे या मिसाईलची चाचणी करण्यात आली होती. आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड (ASFC) यांच्या अंतर्गत ही चाचणी करण्यात आली होती. हा मिसाईल ऑपरेशनल यूजर ट्रायलचा भाग होता. जेव्हा या मिसाईलची चाचणी करण्यात आली, तेव्हा पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लान्स डिव्हिजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते. पण, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत नोटीस टू एअरमेन (NOTAM) जारी करत क्षेत्रात मिसाइल चाचणीची धमकी देत होते. त्या अनुषंगाने ही चाचणी झाली होती.
हेही वाचा: 'जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा...'; राज ठाकरे एल्फिन्स्टनच्या रहिवाशांच्या पाठीशी
अब्दालीचा बार निघाला फुसका:
अब्दाली मिसाइलच्या या चाचणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व मिळू शकले नाही. या चाचणीनंतर पाकिस्तानची लष्करी विश्वासार्हता वाढण्याऐवजी कमी झाल्याचे म्हटले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आजही कमी अंतराच्या जुन्या मिसाइल्सच्या आधारावर ताकद वाढल्याचे दाखवत आहे. भारताच्या मिसाइल यंत्रणेशी अब्दालीची तुलना केल्यानंतर ती एकदम सामान्य असल्याचे दिसते.