मुंबई: मुंबईतील एल्फिन्स्टन पुलजवळ राहणाऱ्या स्थानिकांना त्यांची घरे खाली करण्याची नोटीस शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, घरांची पुढील व्यवस्था कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू होताच स्थानिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून व्यथा मांडली. यादरम्यान, राज ठाकरेंनी नागरिकांना धीर देत म्हणाले की, 'जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या', असे राज ठाकरे यांनी नागरिकांना धीर देत म्हणाले, अशी माहिती मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा: भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी घेतली बाबासाहेब आगे कुटुंबीयांची भेट
योग्य माहिती मिळेपर्यंत घरे खाली होणार नाहीत:
एल्फिन्स्टन पुलजवळील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर या नागरिकांना कुठे घरे दिली जाणार आहेत याची माहितीदेखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी या नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकरणात, राज ठाकरेंनी रहिवाशांना धीर देत म्हणाले की, 'जो कोणी येईल त्याला सांगा, राज ठाकरेंशी आमचं बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाही', असे एक्सवर पोस्ट करत राजू पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यासोबतच, राजू पाटील यांनी नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचा फोटो देखील शेअर केला आहे.
एल्फिन्स्टन पूल प्रकल्पामुळे 19 पैकी 2 इमारतींमधील रहिवासी नागरिक बाधित होणार आहेत. या रहिवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने त्यांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मिळाली आहे. सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) ही जबाबदारी सोपवली असल्याचेही वृत्त आहे. सुधारित सरकारी योजनेचा थेट परिणाम फक्त दोन इमारतींवर होईल, ज्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती सरकारने दिली आहे.