Saturday, May 17, 2025 09:27:30 PM

'दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे'; पंतप्रधान मोदींचा कडक शब्दांत इशारा

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस दाखवण्यात आले आहे. आपण दहशतवाद्यांची उरलेली जमीन नष्ट करू. दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आहे.

दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे पंतप्रधान मोदींचा कडक शब्दांत इशारा
PM Modi On Pahalgam Terror Attack
Edited Image

बिहार: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. लोक दहशतवाद्यांवर पूर्वीपेक्षा मोठ्या आणि अधिक निर्णायक कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस दाखवण्यात आले आहे. आता आपण दहशतवाद्यांची उरलेली जमीन नष्ट करू. दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.' पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात पाकिस्तान विरोधातील भूमिका स्पष्ट केली आहे. 

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमाच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. तसेच दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून केली. यावेळी ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये आपल्यापासून हिरावून घेतलेल्या निष्पाप जीवांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे. आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणी बंगाली होता, कोणी कन्नड होता, कोणी गुजराती होता आणि कोणी बिहारचा होता. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत भारत संतप्त आहे.

हेही वाचा - भारताकडून सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकड्यांची कोंडी

गुन्हेगारांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे - पंतप्रधान मोदी  

मधुबनी येथील कार्यक्रमात बोलतना मोदी म्हणाले की, 'पहलगामच्या गुन्हेगारांना संपवण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. तथापि, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जगाला संदेश देण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून इंग्रजीत म्हटले, 'आम्ही पृथ्वीच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत त्यांचा पाठलाग करू.' दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. 

हेही वाचा - हल्ला करणारे मुस्लिम नाहीत तर ...; पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट संतापला

दहशतवाद्यांना नक्कीच शिक्षा होईल - 

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना नक्कीच शिक्षा होईल, असं आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलं. न्याय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करू. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत आहे. मी वेगवेगळ्या देशांच्या जनतेचे आणि त्यांच्या नेत्यांचे आभार मानतो जे नेहमीच आमच्यासोबत उभे आहेत, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.    


सम्बन्धित सामग्री