Wednesday, June 25, 2025 02:13:42 AM

'आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत...'; एअर मार्शलचा पाकिस्तानला इशारा

सोमवारी ऑपरेशन सिंदूरबाबत तिन्ही दलांच्या डीजी ऑपरेशन्सनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय लष्कराने पुन्हा एकदा शत्रू देश पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे.

आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत एअर मार्शलचा पाकिस्तानला इशारा
Air Marshal AK Bharti
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. सोमवारी ऑपरेशन सिंदूरबाबत तिन्ही दलांच्या डीजी ऑपरेशन्सनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय लष्कराने पुन्हा एकदा शत्रू देश पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच एअर मार्शल ए.के. भारती यांनी रामचरित मानसमधील एका ओळीचा उल्लेख करत आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे.  

भीतीशिवाय प्रेम नाही - 

पत्रकार परिषदेदरम्यान, एअर मार्शल ए.के. भारती यांनी रामचरितमानसमधील एक श्लोक वाचताना सांगितले की, 'विनय ना मानत जलधि गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति।।' रामचरित मानसची ही ओवी रामायणातील त्या प्रसंगाशी संबंधित आहे जिथे भगवान श्रीराम समुद्रातून लंकेला जाण्यासाठी मार्ग मागतात. 3 दिवस विनवणी करूनही समुद्र थांबत नाही, तेव्हा श्री राम रागावतात आणि म्हणतात की भीतीशिवाय प्रेम किंवा आदर नाही. ही ओवी संदेश देते की, जेव्हा एखादी व्यक्ती नम्रता किंवा प्रार्थनेशी सहमत नसते तेव्हा त्याला शक्ती किंवा भीतीचा वापर करून आपला मुद्दा सांगावा लागतो.  

हेही वाचा - पाकड्यांची चिनी बनावटीची क्षेपणास्त्र अयशस्वी झाली; डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट

पुढील लढाई मागील लढाईसारखी होणार नाही - 

दरम्यान, एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हटलं आहे की, हे एक वेगळ्या प्रकारचे युद्ध होते आणि ते होणारच होते. जेव्हा जेव्हा पुढची लढाई होईल तेव्हा देव न करो, लढाई होऊ नये पण जर ती झाली तर ती मागील लढाईसारखी होणार नाही. प्रत्येक लढाई वेगळ्या पद्धतीने लढली जाते. त्यांनी पाकिस्तानला मोठा इशारा देत म्हटले की, आम्ही पुढील मोहिमेसाठी तयार आहोत. आता होणारी लढाई मागील लढाईसारखी नसेल.

हेही वाचा - भारतीय सैन्याची ताकद वाढणार! इस्रो लाँच करणार EOS-09 उपग्रह; काय होणार फायदा?

भारतीय लष्कराच्या या भूमिकेवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, भारतीय लष्कर आता पाकिस्तानला सोडणार नाही. तथापि, आज भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेची सुरुवात रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘याचना नहीं अब रण होगा’ से की गई। (आता युद्ध होईल, विनवणी नाही) या कवितेने झाली. या कवितेच्या ओळी वाचून आज भारतीय सैन्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे असा संदेश दिला. भारत आता पाकिस्तानला सोडणार नाही. जर पाकिस्तानने भारतात दहशतवाद पसरवला तर युद्ध नक्कीच होईल. भारत शत्रू देश पाकिस्तानला युद्धभूमीवर पराभूत करेल, असा इशाराही लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री