Tuesday, March 10, 2026 06:31:57 AM

Hajj Yatra: हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी मोठे बदल! सामान्य नागरिक 5 वर्षांच्या हप्त्यांत पैसे भरू शकतात; जाणून घ्या, केंद्र सरकारचा नवा नियम

आर्थिक कारणांमुळे हजला जाऊ न शकणाऱ्या मुस्लिमांसाठी केंद्र सरकार एक खास योजना घेऊन येत आहे. यामुळे अनेक कमी उत्पन्न स्तरातील मुस्लिमांची हजला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

hajj yatra हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी मोठे बदल सामान्य नागरिक 5 वर्षांच्या हप्त्यांत पैसे भरू शकतात जाणून घ्या केंद्र सरकारचा नवा नियम

Hajj Installment Plan : भारत सरकार हज यात्रेला (Haj Yatra) सामान्य लोकांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एका नवीन योजनेवर विचार करत आहे, ज्यामुळे विशेषतः निम्न उत्पन्न गटातील (Low Income Group) यात्रेकरूंना हजला जाणे सोपे होईल. ज्या यात्रेकरूंकडे हजसाठी लागणारी संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरण्याची क्षमता नाही, ते आता किंवा हप्त्यांमध्ये (Installments) पैसे जमा करून आपले हज यात्रेचे स्वप्न पूर्ण करू शकतील.

हप्त्यांमध्ये रक्कम जमा करण्याची सुविधा
प्रस्तावित व्यवस्थेनुसार, कोणताही हज यात्रेकरू 5 वर्षांपर्यंत हप्त्यांमध्ये (Installments) रक्कम जमा करून हज यात्रेसाठी पात्र ठरू शकेल. हे पाऊल अशा कुटुंबांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जात आहे, जे अनेक वर्षांपासून हज यात्रेचे स्वप्न पाहत आहेत. परंतु, आर्थिक कारणांमुळे त्यांना जाता येत नव्हते. ही योजना लागू झाल्यानंतर हज यात्रेवरील आर्थिक बोजा कमी होईल आणि गरजू लोक वेळेवर आपली बचत पूर्ण करून यात्रेला जाऊ शकतील. यामुळे हज यात्रा अधिक सुलभ (Accessible) होणार आहे.

हेही वाचा - Apple's 5th Store in India : 'या' ठिकाणी भारतात ॲपलचे सुरु होणार पाचवे स्टोअर, 11 डिसेंबरला शुभारंभ

हज प्रक्रिया होणार 'डिजिटल' आणि AI-आधारित
या बदलांसोबतच, हज प्रक्रियेला अधिक आधुनिक बनवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी भारतीय हज समितीने (HCOI) हज 2026 साठी यात्रेकरूंच्या सुविधा सुधारण्यावर एक राष्ट्रीय संमेलन आयोजित केले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी भूषवले. डॉ. कुमार यांनी सर्व हज संबंधित कामे डिजिटल, पोर्टल-आधारित आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही (AI Integrated) वापर करण्याचे निर्देश दिले.

पारदर्शकता आणि वेग वाढवण्यावर भर
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि 'मॅन्युअल कामाशिवाय' पार पडेल, असा विश्वास डॉ. कुमार यांनी व्यक्त केला. याचा थेट फायदा यात्रेकरूंना होईल, ज्यामुळे त्यांना अधिक चांगल्या आणि सुविधाजनक सेवा मिळतील. एकूणच, केंद्र सरकारचा हा निर्णय हज यात्रेला धार्मिक बंधनातून मुक्त करून, आर्थिक आणि प्रक्रियात्मक दृष्ट्या सामान्य भारतीयांच्या आवाक्यात आणण्याचा मोठा प्रयत्न आहे.

हेही वाचा - India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी! दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ


सम्बन्धित सामग्री