मुंबई: सध्या राज्यात सर्वत्र पाऊस पडत असून लोक पर्यटन स्थळांना भेट देऊन निर्सगाचा आनंद घेत आहेत. परंतु, कोल्हापूरमधील एक 45 वर्षीय पर्यटक आंबोली घाटातील 300 फूट दरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्यक्ती रुमाल काढण्यासाठी सेफ्टी रेलिंग ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसला आणि तो दरीत कोसळला. या व्यक्तीचे नाव राजेंद्र बाळासो संगर असे आहे. तो कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कर्मचारी आणि चिली कॉलनी, कोल्हापूरचा रहिवासी आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक! बोईसरमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 3 मुलांचा मृत्यू
राजेंद्र संगर आपल्या 14 सहकाऱ्यांसह पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आंबोली घाटात आला होता. प्राथमिक माहितीनुसार, धबधब्याच्या जवळ रेलिंगजवळून चालत असताना संगर घसरला. जोरदार वाऱ्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दरीत पडला. याबाबत माहिती मिळताचं सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - Drug-free Nashik: नाशिकमध्ये अमलीपदार्थ विरोधी मोहिमेचे यश; सहा महिन्यात 314 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 37 किलो गांजा जप्त
दरम्यान, पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. परंतु दाट धुके आणि परिसरात मोबाईल सिग्नल नसल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. मदतीसाठी आंबोली बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनांचा क्रम समजून घेण्यासाठी पोलिस संगरच्या मित्रांची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना पावसाळ्यात डोंगराळ किंवा धबधब्याच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.