बारामती परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांचे निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे जात असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक घबरलेले व दुखी दिसत आहेत. अनेकांनी ‘अमरा रहे… अजित दादा अमर रहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली, तर काही जण ‘दादा तुम्ही परत या’ असे रडत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अचानक जाण्याने हृदयद्रावक दुःख व्यक्त केले.
अजित पवार यांचे पार्थिव बारामती रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानमध्ये हलवण्यात आले. अंतिम दर्शनासाठी काचेची पेटी तयार केली गेली होती. रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यातील नेते तसेच जय पवार आणि श्रीनिवास पवार याही ठिकाणी उपस्थित होते. पार्थिव गुरुवारी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.