Friday, December 05, 2025 02:15:55 AM

Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची डेडलाईन जवळ!; 1.60 कोटी बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस; अन्यथा हप्ता बंद?

ई-केवायसीच्या या धिम्या गतीमागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी देखील आहेत. अद्यापही दोन-तृतीयांश (सुमारे 1 कोटी 60 लाख) महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे.

ladki bahin yojana  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डेडलाईन जवळ 160 कोटी बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस अन्यथा हप्ता बंद

Ladki Bahin Yojana e-KYC: राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे, परंतु या प्रक्रियेची गती खूपच मंदावलेली आहे. 18 नोव्हेंबर 2025 ही ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, या महत्त्वपूर्ण डेडलाईनमुळे अनेक महिलांचा पुढील हप्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अद्याप 1.60 कोटी महिलांची e-KYC अपूर्ण
राज्यात या योजनेच्या एकूण 2.40 कोटी लाभार्थी महिला आहेत. मात्र, त्यापैकी अद्यापही दोन-तृतीयांश (सुमारे 1 कोटी 60 लाख) महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. सध्या केवळ 80 लाख महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे, उर्वरित 1.60 कोटी महिलांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. ई-केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी मोठी अडचण
ई-केवायसीच्या या धिम्या गतीमागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटित (Divorced) स्त्रियांच्या केवायसीमध्ये येत आहे. नियमानुसार, लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्डासोबतच, कुटुंबातील सदस्याचा (पती किंवा वडिलांचा) आधार क्रमांक आणि ओटीपीद्वारे (OTP) पडताळणी करावी लागते. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा संबंधित ओटीपी मिळवणे शक्य होत नाही. यामुळे या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

हेही वाचा - Uber Metro Ticket Booking: मेट्रो प्रवासासाठी रांगेचा त्रास संपला; डिजिटल मेट्रो तिकीटिंगसाठी उबरची मुंबईमध्ये नवी सुविधा

तांत्रिक सुधारणांचे प्रयत्न सुरू
महिला व बालविकास विभागाने या गंभीर समस्येची दखल घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या अडचणींची कबुली दिली. त्या म्हणाल्या की, विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरू आहे. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई-केवायसीची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे, पण उर्वरित सर्व महिलांसाठी 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत कायम आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना पुढील हप्त्यांसाठी कोणतीही अडचण येणार नाही.

हेही वाचा - Thane Train Accident Case: ठाणे रेल्वे अपघाताबाबत मोठी अपडेट! मध्य रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल


सम्बन्धित सामग्री