सर्वत्र देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. या जयंतीनिमित्त लाल किल्ल्यावर महाराष्ट्राचे मु सर्वांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ज्या ठिकाणी शिवरायांना कैदेत ठेवले होते, आणि गनिमी कावा उपयोग करून सुटले होते त्या जागेला स्मारकाच्या रूपात तयार करायचे आहे. कमिटी तयार केली व यू पी सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. योगी यांनी देखील एक्विझिशन करण्याचा निर्णय केला आहे. प्रक्रिया अंतिम टप्यात सुरू आहे. पुढील वर्षीपर्यंत ती जागा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार मिळून स्मारकाची तयारी करत असू, असं ते म्हणाले.
देशात शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमांत पाहिजे अशी मागणी आहे.मात्र आपले दुर्दैव आहे 7 पिढ्या मध्ये मुघलासाठी 17 पाने आणि शिवाजी महाराजांसाठी 1 परिच्छेद होता. आता NCR मध्ये जी पुस्तक आली त्यात शिवाजी महाराज यांना 20 पाने मिळाली आहे. आता मुघलांचे नाही तर शिवाजी महाराज यांचे विचार शिकवले जातील.
हेही वाचा - Share Market Crash : गुरूवारी शेअर बाजारावर साडेसाती! शेवटच्या एका तासांत गुंतवणूकदारांचे बुडाले 7.30 लाख कोटी रूपये
नंतर ते म्हणाले की, 2030 मधे जन्मशताब्दीला 400 वर्ष पूर्ण होतील, तेंव्हा आम्ही सर्व मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या आग्र्याच्या किल्ल्यात घेऊन येऊ, आणि जयंती साजरी करू.
हेही वाचा - The Kerala Story 2 Controversy: 'द केरला स्टोरी 2' चित्रपटाला कोर्टाचा दणका; प्रदर्शनापूर्वीच केंद्र आणि निर्मात्यांना हायकोर्टाची नोटीस
शिवरायांनी एक अशी लढाई सुरू केली जी स्वराज्यासाठी. त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची स्थापना करण्याची. स्वातंत्र्यानंतर आपल्या शासकांनी दीडशे वर्षाचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास डिलिट करण्याचा काम केला. मात्र त्याना दाखवले परतंत्र मध्ये नाहीबत्र दीडशे वर्ष हिंदवी स्वराज्य देखील होता. हा लाल किल्ला स्वाभिमानी भूमी आहे. इथे शिवजयंती साजरी होणे याच वेगळ महत्त्व आहे. शिवाजी महाराज यांनी संपूर्ण जगाला राजापाठ कसा चालवायचा याचा परिपाठ शिकवला. लवकरच उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने जिथे महाराज कैद होते तेथे देखील कार्यक्रम घेणे सुरू करू, असंही ते म्हणाले.