मुंबई: मुंबईमध्ये सद्या उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळतंय. तीव्र उष्णतेने मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. या तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. या उन्हाळ्याच्या पार्शवभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने या वाढीव एसी बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.
हेही वाचा: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका
खासदार वर्ष गायकवाड यांनी संसदेत मुंबई लोकॅलबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याचसोबत लोकल प्रवासादरम्यान 2468 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि 2697 जण जखमी झाले असल्याची माहिती देखील त्यांनी संसदेत सांगितली. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना मुंबईत 238 नव्या एसी लोकल लवकरच सुरू होणार असल्याच माहिती दिली.
मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर 109 एसी लोकल धावतात. या गाड्या आठवड्याच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी 65 सेवा चालवतात. तर उपनगरीय मार्गांवर अलीकडेच 13 नवीन एसी लोकल सेवांचा समावेश करण्यात आला आहे. हा विस्तार एकूण सेवा सुधारण्यासाठी आणि अधिक आरामदायी प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
त्यामुळे आता या तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. या उन्हाळ्याच्या पार्शवभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने या वाढीव एसी बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.