Thursday, May 22, 2025 08:35:54 PM

नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचे कर्ज माफ करवुन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच, सरकारला इशारा देत नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल शेतकऱ्यांचे कर्ज माफ करवुन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच, सरकारला इशारा देत नाना पटोले म्हणाले की, 'जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही'. तसेच, सरकारवर आरोप करत नाना पटोले म्हणाले की, 'सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे'.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले:

'विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महायुती सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले आहेत', असे पटोले म्हणाले.

हेही वाचा: 7 मे रोजी होणार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी

पटोलेंचा सरकारवर आरोप:

'खोटं बोलून तुम्ही सत्तेत आले आहात. तुम्ही बेईमानीने सत्तेचा वापर करत आहात. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या संख्येकडे दुर्लक्ष करणे हे खूप मोठे पाप आहे', सरकारवर टीकेचा वर्षाव करत नाना पटोले म्हणाले. 'अजित पवारांनी आधी स्वतःचे जाहीरनामे वाचून घ्यावे आणि मग बोलावे', असा सल्लादेखील नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. 'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अधिकार कोणालाही नाही', असे सांगून पटोले सरकारची जबाबदारी अधोरेखित केली.

शेतकरी अडचणीत मात्र सरकारचे दुर्लक्ष:

सध्या, राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. वाढता उत्पादन खर्च, बाजारभाव आणि कर्जाचा बोजा यामुळे आत्महत्या वाढत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सरकारतर्फे आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 'काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष लढा देईल. आमची भूमिका कर्जमाफी मिळवून देण्याची आहे आणि आम्ही ती कायम ठेवू', असे नाना पटोले ठामपणे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री