Russia US Deal: जगभरातील भू-राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडताना दिसतो आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. पुतिन यांनी ट्रम्प यांच्या शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करताना, 'त्यांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही,' असं थेट विधान केलं. या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर नवी राजनैतिक समीकरणं तयार होण्याची चिन्हं दिसत आहेत आणि भारतासाठी ही बाब चिंताजनक ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेचे संबंध स्थिर आणि मजबूत राहिले होते. संरक्षण, व्यापार, आणि रणनीती या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी अनेक करार केले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रशिया आणि अमेरिकेतील संवाद पुन्हा सुरू होताना दिसत असल्याने भारताला नव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा: Pakistani- Afghanistan Conflict : अफगाणिस्ताने पाकड्यांना धडा शिकवला! तालिबानी हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक ठार, अनेक सीमा चौक्या ताब्यात
पुतिन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 'ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाला असला तरी त्यांच्या कामगिरीचं मूल्य कमी होत नाही. त्यांनी गाझामधील तणाव कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. जर हा शांतीचा मार्ग टिकून राहिला, तर तो एक ऐतिहासिक अध्याय ठरेल.' या वक्तव्याने जगभरात चर्चेला उधाण आलं आहे, कारण गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि रशिया हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते.
रशियाच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील समीकरणं नव्याने रचली जात आहेत. START कराराला पुढे नेण्यास दोन्ही देशांची सहमती हे त्याचं मोठं उदाहरण आहे. या घडामोडींमुळे भारताच्या रणनीतिक हितांवर परिणाम होऊ शकतो, कारण भारत रशियासोबत संरक्षण क्षेत्रात तर अमेरिकेसोबत तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात घनिष्ठ संबंध ठेवतो.
गेल्या काही महिन्यांत भारताने अमेरिका आणि रशिया दोन्ही देशांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील अचानक वाढलेली जवळीक भारतासाठी धोरणात्मक कसोटी ठरू शकते. विशेषतः भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताला पूर्ण समर्थन देईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा: Sudan Attack: सुदानमधील अल-फशीर रक्तरंजित! ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यांत अनेक नागरिकांचा बळी गेला
दरम्यान, ट्रम्प यांनीही पुतिन यांचे आभार मानत, 'रशिया आणि अमेरिका हे जगातील दोन शक्तिशाली देश आहेत, आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे,' असं वक्तव्य केलं. या प्रतिक्रियेनंतर जागतिक विश्लेषकांच्या चर्चांना वेग आला आहे.
भारताने मात्र या सर्व प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्यात अमेरिकेचा सहभाग नव्हता, असा भारताचा ठाम दावा कायम आहे. तरीही पुतिन-ट्रम्प समीकरणं मजबूत होत गेल्यास, जागतिक शक्ती-संतुलन भारताच्या राजनैतिक भूमिकेवर परिणाम करू शकते.
सध्या या घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पुतिन आणि ट्रम्प यांची संभाव्य बैठक जर पुढील काही आठवड्यांत झाली, तर ती जागतिक भू-राजकारणाला नवं वळण देणारी ठरू शकते.