Wednesday, May 14, 2025 10:47:09 PM

सकाळी रिकाम्या पोटी प्या इलायचीचं पाणी; शरीरासाठी अमृतासारखं, जाणून घ्या 6 मोठे फायदे आणि बनवण्याची सोपी पद्धत

रिकाम्या पोटी इलायचीचं पाणी पिण्याचे आरोग्यावर अनेक फायदे आहेत, विशेषतः वजन कमी करण्यासाठी हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय अतिशय उपयुक्त ठरतो.

सकाळी रिकाम्या पोटी प्या इलायचीचं पाणी शरीरासाठी अमृतासारखं जाणून घ्या 6 मोठे फायदे आणि बनवण्याची सोपी पद्धत

मुंबई: आजकाल आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. नैसर्गिक आणि घरगुती उपायांमध्ये छोटी इलायची एक महत्त्वाची जागा व्यापते. फक्त पदार्थांचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठीच नव्हे, तर शरीराच्या आरोग्यासाठीही इलायची खूप फायदेशीर आहे. विशेषतः रिकाम्या पोटी इलायचीचं पाणी प्यायल्याने शरीराला अमूल्य फायदे होतात.

1. वजन कमी करण्यात मदत
इलायचीमध्ये असे घटक असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील अतिरिक्त कॅलोरी जळवण्यात मदत करतात. रिकाम्या पोटी इलायचीचं पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे अतिरिक्त खाणं टाळता येतं. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे.

2. त्वचेसाठी लाभदायक
इलायचीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील जंतूंना रोखतात, ज्यामुळे पिंपल्स आणि इतर त्वचाविकार टाळता येतात. इलायचीचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

हेही वाचा:हीट स्ट्रोक आणि हीट एक्सॉशन यामधला फरक जाणून घ्या; निष्काळजीपणा आरोग्यास ठरू शकतो घातक

3. पचन सुधारते
ज्यांचं पचन नियमितपणे बिघडतं, गॅस, अपचन, जळजळ, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होतात, त्यांच्यासाठी इलायचीचं पाणी वरदान ठरू शकतं. हे पचनक्रिया सुधारतं आणि पोटाशी संबंधित तक्रारी दूर करते.

4. तोंडाच्या दुर्गंधीवर नियंत्रण
तोंडाची दुर्गंधी ही अनेकदा दातांमधील किड किंवा मसुड्यांच्या समस्या यामुळे होते. इलायचीमध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंड स्वच्छ राहते आणि दुर्गंधी दूर होते. दररोज इलायची चघळणं आणि इलायचीचं पाणी पिणं हा एक उत्तम पर्याय आहे.

5. हृदयाचे आरोग्य सुधारते
इलायचीमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हृदयावर होणारा ताण कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारते.

6. मेटाबॉलिझम वाढवते
इलायचीचं पाणी मेटाबॉलिझम वाढवण्यातही मदत करतं. मेटाबॉलिझम सक्रिय असल्यास शरीरातील कॅलोरी जलद जळते आणि वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इलायचीचं पाणी एक चांगला नैसर्गिक पर्याय आहे.

इलायचीचं पाणी कसं बनवायचं?
2 ते 3 छोटी इलायची घ्या आणि त्याची थोडी पूड किंवा थोडं क्रश करा. एका ग्लास पाण्यात हे टाका आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. नियमित सेवन केल्यास त्याचे परिणाम लवकरच जाणवू शकतात.

दररोज रिकाम्या पोटी इलायचीचं पाणी प्यायल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळतात. त्यामुळे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी उपाय नक्की करून पाहा.


सम्बन्धित सामग्री