मुंबई, ४ मे २०२४, प्रतिनिधी: 'जय महाराष्ट्र'च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. 'बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धवनी गमावला', 'उद्धवना फक्त बाळासाहेबांची संपत्ती हवी आहे' असा थेट आरोप एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'जय महाराष्ट्र'च्या विशेष मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे :-
- लोकांचा प्रतिसाद महायुतीलाच - शिंदे
- 'जनता पंतप्रधान मोदींच्या कामावर खुश'
- 'आम्ही केलेल्या कामाची पोचपावती मिळतेय'
- 'मोदींच्या विकासाचा लाभ घेऊनही टीका करतात'
- मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- उद्धव सरकारने राज्याचा विकास रोखला - शिंदे
- 'राज्याच्या विकासाला लागलेला ब्रेक आम्ही काढला'
- मविआचे आरोप जनतेला भ्रमित करण्यासाठी'
- जनता राहुलचं नावही घेत नाही - शिंदे
- भारतात उकडलं की राहुल थंड प्रदेशात जातात
- सर्व जग आज भारताची भूमिका ऐकत आहे
- 'पंतप्रधान मोदींमुळे जगात भारताची मान उंच'
- 'मोदी थेट सर्जिकल स्ट्राईक करतात'
- 'बाळासाहेब सगळ्यांचे आहेत'
- 'बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धवनी गमावला'
- उद्धव यांना मुख्यमंत्री शिंदे यांचं उत्तर
- '.. तर बाळासाहेबांनी जोड्याने मारलं असतं'
- 'उद्धवना फक्त बाळासाहेबांची संपती हवी आहे'
- 'खरी शिवसेना आमचीच आहे'
- शिवसैनिक आमच्याच सोबत आहेत.
- 'ठाकरेंनी पंजाला मतदान करणे महाराष्ट्राचे दुर्दैव '
- 'उद्धव यांचा खरा चेहरा आता उघड'
- 'आम्ही १५ जागांवर समाधानी'
- 'उद्धव प्रचारही आरामात करतायत'
- राजन विचारे दिघे आणि बाळासाहेबांच्या विरोधकांसोबत
- दिघे गेल्यावर उद्धवनी त्यांची प्रॉपर्टी शोधली - शिंदे
- 'निवडणुकीत शिव्या देणाऱ्यांना लोक घरी बसवतील'
- मतदान सर्वांनी केलेच पाहिजे'
- मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
- आमची पक्ष संघटना मजबूत - शिंदे
- 'जागांपेक्षा किती निवडून येणार हे महत्वाचे'
- महायुतीचे जागावाटप समन्वयाने - शिंदे
- देशात फक्त मोदी गॅरंटी चालते