Tuesday, November 18, 2025 10:32:16 PM

ASEAN Summit 2025: पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत; मलेशियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं यामागचं कारण

अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, त्यांनी अलीकडेच मोदींच्या सहाय्यकाशी फोनवरून चर्चा केली होती. चर्चा मुख्यतः व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रांवर केंद्रित होती.

asean summit 2025 पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत मलेशियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं यामागचं कारण

ASEAN Summit 2025: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान मलेशियामध्ये होणाऱ्या 47 व्या आसियान शिखर परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी गुरुवारी याची पुष्टी केली आणि सांगितले की, दिवाळी उत्सवामुळे मोदी व्हर्च्युअल माध्यमातून शिखर परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही याची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, 'मी आसियान-भारत शिखर परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहण्यासाठी आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यास उत्सुक आहे.' 

हेही वाचा - Pakistan-Afghanistan Conflict: पाकिस्तान-तालिबानमधील संघर्षाचे हे मूळ! 'ड्युरंड रेषा' काय आहे? अफगाणिस्तान याला सीमा का मानत नाही?

भारत-मलेशिया संबंध दृढ करण्याची तयारी

अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, त्यांनी अलीकडेच मोदींच्या सहाय्यकाशी फोनवरून चर्चा केली होती. चर्चा मुख्यतः व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रांवर केंद्रित होती. अन्वर यांनी याबाबत स्पष्ट केले की, मलेशिया भारतासोबत द्विपक्षीय आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. 

हेही वाचा - US sanctions on Russia: अमेरिकेकडून रशियावर आर्थिक आघात; दोन प्रमुख तेल कंपन्यांवर कठोर निर्बंध

दरम्यान, मलेशियात होणाऱ्या शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अनेक आसियान देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प 26 ऑक्टोबर रोजी क्वालालंपूरमध्ये दोन दिवसांचा दौरा करतील. तथापी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींच्या निर्णयावर टीका केली. त्यांनी असा आरोप केला की पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वैयक्तिक भेट टाळू इच्छित आहेत. त्यांच्या मते, मोदींनी ट्रम्प यांना भेटण्याची भीती बाळगून इजिप्तमध्ये गाझा शांतता परिषदेला उपस्थित राहणे टाळले. जयराम रमेश यांनी आरोप केला की, क्वालालंपूरमधील शिखर परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित न राहून मोदी जागतिक नेत्यांना भेटण्याची आणि जागतिक स्तरावर आपली छबी मजबूत करण्याची संधी गमावत आहेत.


सम्बन्धित सामग्री