Thursday, May 22, 2025 05:52:27 PM

पूर्ववैमनस्यातून 17 वर्षीय मुलाचा निर्घृण खून; जंगलात आढळला मृतदेह

नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात एका 17 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पूर्ववैमनस्यातून 17 वर्षीय मुलाचा निर्घृण खून जंगलात आढळला मृतदेह

नाशिक: नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात एका 17 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मृत तरुणाचे नाव रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे (रा. बोधे दहिवाळ) आहे. मृतदेह मिळाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांत संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली केली आहे. या आरोपींनी नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात युवकाचा मृतदेह आढळल्याची नोंद आहे.

पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

मृत रवींद्र अहिरे यांच्या वडिलांनी (दीपक अहिरे, वय: 42) नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितले आहे की, पूर्ववैमनस्यातून रवींद्र दीपक अहिरे याला आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड या तरुणांनी संगनमत करून आपल्या मुलाला जीव घेण्याचा कट रचला. त्यांनी त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर, रवींद्र अहिरे याला जीव घेण्यासाठी धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून खून केला आणि फरार झाले असल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा: पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात

चार संशयित ताब्यात

नांदगाव पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एस.पी.ओ. सुनील बधे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन केले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

संतप्त कुटुंबीयांची मागणी

'हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्यामुळे त्या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,' अशी मागणी मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास वेगाने पुढे नेत नांदगाव पोलिसांनी रवींद्र अहिरे याचा खून करणाऱ्या चार संशयित हल्लेखोरांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री