Wednesday, May 21, 2025 02:43:43 PM

मुंबई 26/11 हल्ल्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात; भाजप उपाध्यक्षांचा खळबळजनक दावा

'26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता. सर्वांना याची कल्पना होती की मुंबईवर हल्ला होणार आहे', असा खळबळजनक आरोप भाजपचे उपाध्यक्षांनी केले.

मुंबई 2611 हल्ल्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात भाजप उपाध्यक्षांचा खळबळजनक दावा

मुंबई: '26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय इतका मोठा हल्ला होऊच शकत नाही. इतकंच नाही, तर सर्वांना याची कल्पना होती की मुंबईवर हल्ला होणार आहे', असा खळबळजनक आरोप भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केले होते.

पुढे भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणाले, 'नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या साखळीतून हिंदुत्ववादी संघटनांना मोडून काढण्याचा कट रचला जात आहे,' असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणावर भाजपच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया
दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणावर भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणाले की, 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेले विक्रम भावे लिखित 'दाभोलकर हत्या आणि मी' या पुस्तकाचे प्रकाशन भंडारी यांच्या हस्ते झाले होते. या दरम्यान, सनातन संस्थेचे अभय वर्तक, ॲड. संजीव पुनाळेकर आणि भावे उपस्थित होते. तेव्हा भंडारी म्हणाले की, 'सत्ता बदलली तरी पोलिस व्यवस्था अजूनही बदललेली नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. बारामतीच्या काकांना आमच्या कामाचा राग होता'.

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या महाराष्ट्राला इथून पुढे पवारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाणार आहे का? 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाने हिंदुत्ववादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे,' अशी टीका यादरम्यान पुनाळेकर यांनी केली. पुढे वर्तक यांनी टीका करत वक्तव्य केले की, 'विक्रम भावे यांना हिंदू दहशतवाद असे नाव देऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंनिसवर प्रशासक नेमून ती नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा.'

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई- रिक्षा वितरणाचा कार्यक्रम
 

प्रशासनावर टीका करत माधव भंडारी म्हणाले

पुढे माधव भंडारी यांनी प्रशासनावर टीका करत म्हणाले की, 'सध्या, गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. जरी देशात राजकीय बदल झाला तरी सुद्धा तेवढे काही भागत नाही. सरकार असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळे लोक आहेत. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो आहोत, असं देखील नाही. व्यवस्था बदलण्याचे आव्हान मोठे आहे.'


सम्बन्धित सामग्री