Sunday, February 16, 2025 10:58:51 AM

Manoj jarange Patils explosive press conference
जरांगे पाटलांचे राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांवर गंभीर आरोप

&quotमी पण आता मागे लागणार आहे, मी बाहेर काढणार. त्याच्या टोळीने वाईट कृत्य केले आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्या टप्प्याने कामाला लागणार आहे.&quot

जरांगे पाटलांचे राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांवर गंभीर आरोप 

जय महाराष्ट्र न्यूज : मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील काही प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यांचा आरोप होता की, काही मंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी राज्यात घोटाळे करत आहेत, ज्यामुळे राज्याची इमेज खराब झाली आहे. त्यांच्यानुसार, हे मंत्री गोरगरिबांच्या ताटात माती कालवण्याचे काम करत आहेत. ते म्हणाले, “हे सगळे लफडेबाज घोटाळेबाज आहे, राज्याला लागलेले दुर्दैवी डाग आहे. गोर गरिबांच्या ताटात माती कालवणे त्यांचा पिंड आहे.”

मनोज जरांगे पाटील यांनी या भ्रष्ट मंत्र्यांना सरकार कशाप्रकारे जवळ धरते याबद्दल प्रश्न उपस्थित केला. "इतका भ्रष्टाचार एक मंत्री करत असेल तर त्याला सरकार जवळ कसे करते हा प्रश्न आहे," अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, "मी पण आता मागे लागणार आहे, मी बाहेर काढणार. त्याच्या टोळीने वाईट कृत्य केले आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्या टप्प्याने कामाला लागणार आहे."

पत्रकार परिषदेत त्यांनी हारवेस्टर योजनेतील घोटाळ्याबद्दलही भाष्य केले. शेतकऱ्यांना हारवेस्टर अनुदान वेळी या लोकांनी पैसे मागितले होते, असे काही शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले. "यांचं कुणावर प्रेम नाही, फक्त स्वतःवर आहे," असं ते म्हणाले.

👉👉 हे देखील वाचा : राज्य सरकारचा “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” उपक्रम सुरू

याच वेळी, मनोज पाटील यांनी धनंजय मुंडे यांवरही आरोप केले की, तो संतोष देशमुख खून प्रकरणात पुरावे नष्ट करत आहे. ते म्हणाले, "आरोपी त्यांनी लपवला, खून करायला पाठवले आणि खंडणी मागायला सांगितलं. जर हा असा बाहेर असेल आणि पुरावे नष्ट केले तर मुख्यमंत्री आणि अजित दादा जबाबदार असतील."

मनोज पाटील यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. “धनंजय मुंडे संघटित गुन्हेगारी घडवून आणतो. सगळे गुन्हे या टोळ्या करतात, हे लोक मुंडे वापरून घेतात,” असे ते म्हणाले.

तसेच, सोलापूरकरांबद्दलही मनोज पाटील यांनी आक्रमकपणे टिप्पणी केली आणि “ही मूर्खांची पिलावळ आहे. यांची थोबाड फोडणे गरजेचे आहे,” असे म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी महापुरुषांवर अशाप्रकारे शिंतोडे उडवले की त्यांना ठोकले पाहिजे.मनोज पाटील यांचे हे आरोप सरकार आणि संबंधित मंत्री वर्गावर दबाव निर्माण करणारे ठरू शकतात. त्यांनी यामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाचे स्पष्ट संकेत दिले, तसेच भविष्यकाळात या मुद्द्यांची विस्तृत चौकशी होईल असेही ते म्हणाले.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री